स्वप्निल शैलेश पालांडे (23), कुणाल कुमार दुबळा (23) आणि अफरोज खलील शेख (28) असं या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणांचे नाव आहे. हे तिघेही पालघर पूर्वेतील वीरेंद्र नगर परिसरातील रहिवासी होते.
नातेवाईकांचा पोलिसांवर आरोप
या घटनेनंतर मृतकाच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, अपघातापूर्वी काही पोलीस कर्मचारी घटनास्थळी आले होते. पोलिसांनी त्यावेळी त्या तिघांना मारहाण केली. पोलिसांच्या भीतीने तरुण पळू लागले आणि पळताना रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना मालगाडीच्या धडकेत त्यांचा जीव गेला. या प्रकारामुळे नातेवाईकांसह संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
पोलीस तपास सुरु
या अपघाताची माहिती मिळताच जीआरपी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिघांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणाचा सध्या तपास सुरु आहे. तपासानंतर या अपघाताचे नेमके कारण समोर येईल. मात्र जर नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार बघितल्यागेले तर पोलीस या तिघांना का मारहाण करत होती? असा देखील एक प्रश्न उपस्थित होत आहे. या अपघाताने तिघांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
डहाणू शहरात गुन्हेगारांचा धुमाकूळ; हातचलाखीने महिलेची १५ हजारांची केली लूट
डहाणू शहरात दिवसाढवळ्या घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बँकेबाहेरच ‘नकली नोटा तपासून देतो’ असा बहाणा करून २ अज्ञात इसमांनी हातचलाखी करत महिलेची १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे डहाणूत गुन्हेगारांना कायद्याचे भय उरले आहे का?, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
Ans: ही घटना पालघर पूर्वेतील जैन मंदिराजवळ घडली.
Ans: मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
Ans: नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांच्या भीतीने तरुण पळाले आणि रेल्वे रुळ ओलांडताना मालगाडीची धडक बसली.






