पालघर तालुक्यातील धनसार काशीपाडा येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. नवरात्रीच्या उपवासात मुलाने लॉलीपॉप मागितल्याचा कारणावरून आईनेच आपल्या दोन मुलांना बेदम मारहाण करून एकाची हत्या केल्याचे समोर आले आहे. मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव चिन्मय गणेश घुमडे असे आहे. तो केवळ सात वर्षाचा आहे. तर त्याची मोठी बहीण गंभीर जखमी असून परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
मारहाण करणाऱ्या आईचे नाव पल्लवी घुमडे (वय 40) असे आहे. पल्लीवीचे नवरात्रौत्सवाचे उपवास सुरू होते. त्यात मुलं हट्ट केल्यावर आई-वडील दोघेही त्यांना मारायचे अशी माहिती समोर आली आहे. घटनेच्या दिवशी दोन्ही मुलांनी चिकन आणून देण्याची मागणी केली. मात्र, या किरकोळ कारणावरून संतापलेल्या पल्लवीने स्वयंपाकघरातील लाटण उचलून मुलांना मारहाण केली. यात सात वर्षीय चिन्मयच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याची मोठी बहीण मात्र गंभीर जखमी असून उपचार सुरु आहेत. ही घटना उघड होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पल्लवीला अटक केली. सध्या पालघर पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
पती-पत्नी राहत होते वेगळा
मृत बालकाची आई पल्लवी घुमडे (वय 40) हिला पोलिसांनी अटक केली आहे. पल्लवी आणि तिची पती गणेश घुमडे हे मूळ भाईंदर येथे राहत होते. गणेश रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होता. पती-पत्नीमध्ये वैचारिक मतभेदांमुळे नेहमी वाद व्हायचे आणि त्यामुळे पाच महिन्यांपूर्वी पल्लवी पतीपासून वेगळी राहू लागली. ती आपल्या बहिणीकडे राहत होती आणि एका कंपनीत काम करत होती.
धावत्या लोकलमधून फेकला नारळ, डोक्याला लागून 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
मुंबईची जीवनवाहिनी म्हणून लोकलची ओळख आहे. लोकलमधून पळून अनेक प्रवाश्यांचे मृत्यू झालं आहे. आता लोकल मधून पळून नाही तर धावत्या ट्रेनमधून
प्रवाशाने नारळ फेकल्याने एकाच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. प्रवाशाने नारळ फेकला आणि तो पुलावरून जात असलेल्या तरुणाच्या डोक्याला लागल्याची घटना समोर आली आहे. त्याला उपचारांसाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात नेण्यात आलं होत. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी पावणे नऊच्या दरम्यान भाईंदर नायगाव रेल्वे स्टेशनवरील, भाईंदर रेल्वे खाडी ब्रीजवर घडली आहे. संजय दत्ताराम भोईर (वय 25) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.