
Pune Crime, Lawrence Bishnoi Gang,
हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी भागात हा प्रकार घडला आहे. दरम्यान, गोळीबारानंतर गुन्हे शाखेच्या अपर पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशीरापर्यंत गोळीबार करणाऱ्यांचा शोध पोलिस घेत होते.
महंमदवाडी हडपसर येथील ४१ वर्षीय व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. त्यानुसार, फुरसुंगी पोलिसांनी आरजू बिश्णोई गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि २२) दुपारी साडेचार वाजतापासून ते रात्री घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यवसायिक असून, त्यांचा लोखंडाचा व्यवसाय आहे. व्यवसायिकाच्या मामाच्या मुलाच्या मोबाईलवर देखील आरजू याने फोन करून तुम्ही दहाजण पार्टनर आहेत. मला प्रत्येकाकडून ५ कोटी रुपये हवे आहेत. मी लॉरेन्स बिष्णोई टोळीतून बोलतोय. मला दोन दिवसात पैसे हवे आहेत, असे बोलून त्याने फोन कट केला.
व्यवसायिक आणि त्याच्या मामाच्या मुलाला एकाचवेळी फोन आल्याने त्याने आपल्या ओळखीच्या ओडीसा येथील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यांनी व्यवसायिकाला वानवडी पोलिस ठाण्यात पाठवले. पोलिस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांनी माहिती घेऊन त्या व्हॉट्सअप क्रमांकावर फोन केला. मात्र तो उचलला नाही. हा प्रकार फुरसुंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने व्यवसायिक तेथे पोहचले. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू असतानाच इकडे गोळीबाराची घटना घडली आणि एकच खळबळ उडाली.
“आरजू बिष्णोई नावाच्या व्यक्तीने फोन करून व्यवसायिकाकडे खंडणीची मागणी केली. व्यवसायिक पोलिस ठाण्यात असताना, त्यांच्या गोडाऊनवर गोळीबार करण्यात आला आहे. याप्रकरणी, फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.”
गोहर हसन, पोलिस उपायुक्त पुणे शहर
व्यवसायिक फुरसुंगी पोलिस ठाण्यात पोहचले तोपर्यंत रात्रीचे आठ वाजले होते. पोलिसांना ते माहिती देतच होते. तेवढ्यात सव्वा आठ वाजताच्या सुमारास त्यांच्या नोकराने फोन करून त्यांना सांगितले की, गोडाऊनवर गोळीबार झाला आहे. परत सव्वा ९ वाजताच्या सुमारास आरजू याने फोन केला. आता कोणालाच सोडणार नाही. कुटूंबातील मुलाना सुद्धा. तु गोडाऊनमधून बाहेर पड. एका तासात तुला आम्ही चमत्कार दाखविला आहे. असे बोलून फोन कट केला.
Pune Crime त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तपास करुन खंडणी प्रकरणात आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आता पुण्यात अशीच घटना घडल्याने व्यावसायिकांमध्ये बिष्णोई टोळीची मोठी दहशत वाढत चालल्याचे दिसत आहे.