पार्किंगमध्ये लघुशंका केल्याने झाला वाद; टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण
उल्हासनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न झाल्यानंतर केवळ काही दिवसातच नवरा बायकोमध्ये वाद होण्याला सुरवात झाली. वाद विकोपाला गेला आणि पत्नी माहेरी निघून गेली. गेली त गेली जातांना घरातील भांडीकुंडी सगळाच घेऊन गेली. सामान परत आण्यासाठी नवरा थेट 10-12 जणांना घेऊन पत्नीच्या माहेरी पोहोचला आणि नंतर जे काही घडलं ते थरारक होत. संतप्त नवऱ्याने सासू, सासरे आणि पत्नीच्या भावावर लोखंडी रॉड आणि लाठ्याकाठ्यांनी थेट प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मधील भरतनगर परिसरात घडली. याप्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
आरोपी जावयाचं नाव समाधान बाविस्कर असं आहे. समाधानने 20 मे रोजी चिदानंद गावडे यांच्या मुलीशी लग्न केलं होतं. मुलीचं हे दुसरं लग्न होत. लग्नानंतर काही दिवसांतच नवरा-बायकोमध्ये सतत वाद व्हायला लागले. वाद हळूहळू विकोपाला गेला आणि चिदानंद गावडे यांची मुलगी माहेरी परत गेली. बर गेली त गेली जातांना तिने तिच्या वैवाहिक आयुष्यातील खरेदी केलेल्या संसारोपयोगी वस्तू देखील सोबत घेऊन गेली. यामुळे समाधान बाविस्कर नाराज झाला आणि त्याने त्या वस्तू मागण्यासाठी १० ते १२ जणांसोबत गावडे कुटुंबाच्या घराकडे गेला.
समाधानने ते वस्तू मागितल्यास वस्तू परत देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे तो संतप्त झाला आणि त्याच्या साथीदारासोबत रेखा गावडे (सासू), चिदानंद गावडे (सासरे) आणि करण गावडे (पत्नीचा भाऊ) यांच्यावर लोखंडी रॉड आणि लाठ्याकाठ्यांनी प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी समाधान आणि इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
NEET मध्ये कमी गुण पडल्याने संतप्त मुख्याधापक वडिलांकडून मुलीची हत्या; सांगलीतील हृदयद्रावक घटना