दोन तरुणांमध्ये जोरदार 'राडा' (फोटो- istockphoto)
पोलिसांसमक्षच एकमेकांना जीवे मारण्याची धमकी
कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने दिली फिर्याद
परिसरातील सार्वजनिक शांततेचा भंग
रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या मारुती मंदिर, गोडबोले स्टॉप परिसरात सकाळच्या सुमारास दोन तरुणांमध्ये जोरदार ‘राडा‘ झाल्याची घटना घडली आहे. सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना थापटांनी मारहाण करणे, शिवीगाळ करणे आणि इतकेच नव्हे तर पोलिसांसमक्षच एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यानेच फिर्याद दिली असून, रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दोन्ही तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या धाकाकडे केला कानाडोळा
ही घटना सकाळच्या सुमारास मारुती मंदिर, गोडबोले स्टाँध देवील सार्वजनिक ठिकाणी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी १) ऋतिक बेरप्या खेत्री (वय २० वर्ष, रा. कुवारबाव, रविंद्रनगर), २) आकाश चंद्रकांत खेत्री। वय २३ वर्ष, रा. क्रांतीनगर झोपडयट्टी) हे दोघेही भररस्त्यात एकमेकांशी वाद घालत होते. हा वाद इतका विकोपाला गेला की त्यांनी एकमेकांना हाताच्या वापटांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. ज्यावेळी हा प्रकार सुरू होता, त्यावेळी पोलिस कर्मचारी तेथे हजर होते. मात्र कायद्याचा कोणताही धाक न बाळगता या दोघांनी पोलिसांसमक्षच एकमेकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
बायकोला धक्का दिल्यावरून वाद; एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण
परिसरातील सार्वजनिक शांततेचा भंग
‘तुला मारून टाकीन अशा जीये मारण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली त्यांच्या या कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक शांततेचा भंग झाला. सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे मारहाण करणे आणि धमकी देणे वा गंभीर प्रकाराची दखल घेत, पोलिस मुख्यालय रत्नागिरी येथे नेमणुकीस असलेले पोलिस कॉन्स्टेबल भूषण शांताराम पाताडे (वय ३४) यांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद दिली.
लुटेरी नवरीचा धुमाकूळ
पती-पत्नीचे नाते हे प्रेम आणि विश्वासावर आधारलेले असते, पण याच नात्याच्या नावाखाली विश्वासघात आणि फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे, जिथे पोलिसांनी एका ‘लुटेरी नवरीला’ तिच्या साथीदारासह अटक केली आहे.
ही घटना उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील पटवाई पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. २८ ऑक्टोबर रोजी याच भागातील एका तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, तरुणाच्या कुटुंबाने एका युवतीसोबत त्याचे लग्न निश्चित केले होते. अनेक विधी झाले, तसेच ‘गोद भराई’चा कार्यक्रमही अनेक लोकांच्या उपस्थितीत पार पडला.






