crime (फोटो सौजन्य: social media)
राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्याला रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा आवाहन करण्यात आला आहे. आता मुंबईच्या भांडुप येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या भांडुपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरामध्ये कानात हेडफोन घालून भर पावसात प्रवास करणे एका सतरा वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतले आहे.
Delhi CM Attack: कोण आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला करणारा? गुजरातशी आहे कनेक्शन
नेमकं काय घडलं?
मृतकाचे नाव दीपक पिल्ले असे आहे. दीपक पिल्ले हा एल. बी.एस मार्गावरून आपल्या घरच्या दिशेने निघाला होता परंतु रस्त्यात महावितरणाची हाय टेन्शन वायर उघडी होती. ज्यामुळे शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. तिथल्या प्रत्यक्ष दर्शनीने दिलेल्या माहितीनुसार दीपक याने कानात हेडफोन घातले होते. येथील नागरिकांनी त्याला हाक मारून बाजूला जाण्यासाठी आवाज देखील दिले. परंतु कानातल्या हेडफोनमुळे त्याला ऐकू आले नाही आणि तो या तारांच्या संपर्कात गेला आणि शॉक लागून त्याचा मृत्यू झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे काही नागरिकांचे वाचले जीव
महत्त्वाचे म्हणजे येथील नागरिकांनी या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या अनेक जणांना सूचना करून येथून बाजूला जाण्यास सांगितलं होतं त्यामुळे अनेक नागरिकांचे प्राण येथील स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे वाचले आहेत. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे काही नागरिकांचे जीव वाचले. पण दीपकला वाचवता आले नाही. त्याच्या कानात हेडफोन होता. त्याला नागरिकांनी हाका मारल्या. त्याला आवाज दिला. पण हेडफोन लावले असल्याने त्याला नागरिकांचा आवाज ऐकू आला नाही आणि वीजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने शॉक लागून त्याचा मृत्यू झाला.
नागरिकांचा संताप
घटनेची माहिती मिळताच पोलिसांना तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तर महावितरणला पण याची नागिरकांनी सूचना केली. पावसाळ्यात अशा उघड्या तारा अनेकांसाठी प्राणघातक ठरत आहे. महावितरणने तात्काळ याबाबत माहिती घ्यायला हवी होती. हलगर्जीपणामुळे एका तरुणाला जीव गमावावा लागल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे. तर रस्त्यावरून जाताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. हेडफोनपेक्षा प्राण महत्त्वाचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विद्युत तारा अथवा लोखंडी विद्युत खांबाला पावसात हात न लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर या दीपकच्या कुटुंबाला या घटनेने धक्का बसला आहे. दीपक काही वेळेपूर्वीच घरातून बाहेर पडला होता. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या घरच्यांना धक्का बसला.
जळगाव हादरलं! दारूच्या नशेत आधी कुऱ्हाडीने पत्नीवर प्राणघातक हल्ला
जळगाव जिल्ह्यातील बोरनार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत संतापलेल्या पतीने पत्नीवर आधी कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेनंतर अपराधी भावनेतून त्याने स्वतः धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणाऱ्या मृतकाचे नाव आनंदा महारू धनगर (४२) असे नाव आहे.
संतापजनक! मावस भावानेच केला तरुणीवर अत्याचार, मावशीच्या नातेवाईकांकडून धमकी, तरुणीने संपावले जीवन