
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात धनंजय उरड (वय ५०) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी पहाटे घडला आहे. माहितीनुसार, तक्रारदार एका चिंकन सेंटरमध्ये मॅनेजर म्हणून नोकरीस आहेत. पुण्यातील वेगवेगळ्या चिंकन सेंटरला त्यांच्याकडून बॉयलर कोंबड्या पुरविल्या जातात. फलटणवरून त्यांची कोंबड्यांची गाडी येते. दरम्यान, नेहमीप्रमाणे रविवारी रात्री ११३४ कोंबड्यां घेऊन गाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट भागातील पार्किंगमध्ये उभी केली होती. चालक गाडी पार्ककरून झोपण्यासाठी गेला. त्यावेळी अज्ञाताने या गाडीतील तब्बल ८०० जिवंत कोंबड्या चोरून पोबारा केला. तक्रारदार नेहमीप्रमाणे आले असता त्यातील कोंबड्या गायब असल्याचे निदर्शनास आले. नंतर त्यांनी तातडीने लष्कर पोलिसांत तक्रार दिली. प्रत्येक कोंबडीची किंमत सुमारे २०० रुपये असून, चोरट्यांनी १ लाख ६० हजार रुपयांच्या कोंबड्या चोरून नेल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेजची पाहणीकरून तपास करत आहेत.
पुण्यात आता कशाची चोरी होईल, सांगता येत नाही !
पुण्यातील चोरट्यांचे लक्ष्य दिवसेंदिवस बदलत आहे. कधी वाहनांचे टायर, कधी बॅटऱ्या, कधी मंदिरातील दानपेट्या, कधी चंदनाची झाडे, तर आता थेट ८०० जिवंत कोंबड्या चोरट्यांनी लंपास केल्या. त्यामुळे “पुण्यात आता कशाची चोरी होईल, याचा काहीच नेम राहिलेला नाही,” अशी प्रतिक्रिया व्यापारी आणि नागरिकांमधून उमटत आहे.
Ans: तब्बल 800 जिवंत कोंबड्या.
Ans: अंदाजे ₹1.60 लाखांचे.
Ans: लष्कर पोलीस ठाण्याचे पोलीस.