Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोदींना ७५ वर्षांचा नियम का लागू नाही? अरविंद केजरीवालांनी सरसंघचालक भागवतांना विचारले ‘हे’ ५ प्रश्न

दिल्ली दारू धोरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची १३ सप्टेंबरला तिहार तुरुंगातून सुटका झाली. त्यांनी १५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती आणि त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिलीच जाहीर सभा घेतली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 22, 2024 | 06:10 PM
मोदींना ७५ वर्षांचा नियम का लागू नाही? अरविंद केजरीवालांनी सरसंघचालक भागवतांना विचारले 'हे' ५ प्रश्न

मोदींना ७५ वर्षांचा नियम का लागू नाही? अरविंद केजरीवालांनी सरसंघचालक भागवतांना विचारले 'हे' ५ प्रश्न

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली: दिल्ली दारू धोरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची १३ सप्टेंबरला तिहार तुरुंगातून सुटका झाली. त्यांनी १५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती आणि त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिलीच जाहीर सभा घेतली आहे. या सभेतून त्यांनी भाजप, नरेंद्र मोदी, केंद्र सरकार यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना ५ महत्वाचे प्रश्न देखील विचारले आहेत.

“या नेत्यांना (भाजपला) केसेस आणि खटल्यांची पर्वा नाही, त्यांची चामडी जाड आहे. पण मी तसा नाही. मी नेता नाही, माझी चामडी जाड नाही. मला चोर आणि भ्रष्टचारी म्हटले की मला फरक पडतो, म्हणूनच मी आज खूप दुखी आहे. माझ्या मनाला खूप वेदना होत आहेत. म्हणून मी राजीनामा दिला, असे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. दिल्लील जंतरमंतर मैदानावर आयोजित ‘जनता की अदालत सभेत बोलताना केजरीवालांनी भागवतांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

अरविंद केजरीवालांचे सरसंघचालकांना ५ प्रश्न

१. ज्या प्रकारे नरेंद्र मोदी हे लालूच देऊन किंवा ईडी-सीबीआयच्या मदतीने दुसरा पक्ष फोडत आहेत. सरकार पाडत आहेत. हे देशातील लोकतंत्रासाठी योग्य आहे का?

२. देशभरातील अनेक भ्रष्टाचारी नेत्यांना मोदींनी आपल्या पक्षात घेतले आहे. यामध्ये तर काही नेते असे आहेत की ज्यांच्यावर भाजप व मोदींकडून भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना भाजपचे हे राजकारण मान्य आहे का?

३. भाजप हे संघाच्या मुशीत तयार झाले आहे, असे बोलले जाते. भाजप भार्षेत होणार नाही याची काळजी घेणे आरएसएसची जबाबदारी आहे. आज भाजप ज्या पद्धतीने वागत आहे ते मोहन भागवताना पटते आहे का?

४. भाजपला आता आरएसएसची गरज नाही असे जेपी नड्डा लोकसभा निडवणुकीत म्हणाले होते. आरएसएस तर भाजपसाठी आईसमान आहे. मग मुलगा एवढा मोठा झाला का की तो आईलाच डोळे दाखवू लागला आहे? हे योग्य आहे का?

५. तुम्ही सगळ्यांनी मिळून एक नियम तयार केला होता की, ७५ वर्षे वय पूर्ण झाले की नेते निवृत्त होतील. या नियमप्रमाणे आडवाणी, मुरली मनोहर जोशी निवृत्त झाले. मग हा नियम मोदींना लागू होत नाही का ?

RSS प्रमुख श्री मोहन भागवत जी से मैं ये 5 सवाल पूछना चाहता हूं। pic.twitter.com/ZGVGiYj3F3

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) September 22, 2024

मी माझ्या आयुष्यात फक्त आदर आणि प्रामाणिकपणा कमावला आहे. माझ्या पक्षाच्या बँकेत कोणतेही पैसे नाहीत. मी फक्त आदर कमावला आहे. 10 वर्षांनंतर मी सीएम पदाचा राजीनामा दिला आहे. काही काळानंतर मी मुख्यमंत्री निवास देखील सोडेन. आज माझ्याकडे दिल्लीत राहण्यासाठी घरही नाही. पण नवरात्रीच्या दरम्यान मी मुख्यमंत्री निवासस्थान सोडेल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

 

Web Title: Former chief minister arvind kejriwal ask 5 question to rss chief dr mohan bhagwat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2024 | 06:05 PM

Topics:  

  • Arvind kejriwal
  • BJP
  • narendra modi
  • Rss Chief Mohan Bhagwat

संबंधित बातम्या

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
1

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
2

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
3

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप
4

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.