Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप

राहुल गांधींनी बिहारमध्ये 'वोटर अधिकार यात्रा' सुरू केली. निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत त्यांनी भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 17, 2025 | 03:27 PM
Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप
Follow Us
Close
Follow Us:

Rahul Gandhi on BJP: काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आजपासून बिहारमध्ये (Bihar) ‘मतदार अधिकार यात्रा’ (Voter Adhikar Yatra) सुरू केली आहे. मतदार यादीतील त्रुटींच्या विरोधात महाविकास आघाडीने बिहारच्या सासाराममधून या यात्रेची सुरुवात केली. ही यात्रा सुमारे १६ दिवस चालणार असून, त्यात राज्यातील २५ जिल्ह्यांचा समावेश आहे. या यात्रेत राहुल गांधींसोबत तेजस्वी यादव (Tejasvi Yadav) आणि डाव्या पक्षांचे नेतेही सहभागी झाले आहेत. माजी मुख्यमंत्री लालू यादव (Lalu Yadav) यांनीही सासाराममध्ये या यात्रेत हजेरी लावली. यात्रेच्या सुरुवातीपूर्वी राहुल गांधींनी भाजपवर (BJP) जोरदार हल्ला चढवला.

भाजप-RSS कडून संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न

जनसभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, भाजप-आरएसएस देशभरात संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. जिथे निवडणूक होते, तिथे ते जिंकतात. ‘आम्ही थोडी तपासणी केली तेव्हा लक्षात आले की, निवडणूक आयोगाने (EC) जादूने महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार केले आहेत. जिथेही नवीन मतदार तयार झाले, तिथे भाजपच्या युतीने विजय मिळवला,’ असा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यांनी सांगितले की, त्यांनी याबद्दल तक्रार केली आहे आणि आता कर्नाटकातही त्यांनी तपास सुरू केला आहे.

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू

बिहारमध्ये मतदारांची चोरी करण्याचा प्रयत्न?

राहुल गांधी म्हणाले की, ‘निवडणूक आयोगाने माझ्याकडून प्रतिज्ञापत्र मागितले, पण भाजप आणि त्यांच्या नेत्यांकडून ते मागितले नाही. आम्ही सीसीटीव्ही आणि व्हिडिओग्राफी मागितली तर त्यांनी नकार दिला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतांची चोरी केली जात आहे. आता ते बिहारमध्येही मतदारांना वगळून निवडणुकांमध्ये चोरी करण्याची तयारी करत आहेत.’ त्यांनी पुढे सांगितले की, ‘आम्ही त्यांना असे करू देणार नाही. बिहारची जनताही हे होऊ देणार नाही. निवडणूक आयोग काय करत आहे, हे संपूर्ण देशाला माहीत आहे. आम्ही सर्वांना दाखवून दिले आहे की निवडणूक आयोग कशी चोरी करत आहे. आम्ही त्यांची ही चोरी पकडून जनतेसमोर आणणार आहोत.’

तेजस्वी यादव यांचा मोदी सरकारवर निशाणा

तेजस्वी यादव यांनी राहुल गांधी यांचे कौतुक केले. ‘हा संविधान वाचवण्याचा संघर्ष आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारची झोप उडवणारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते माझे मोठे भाऊ राहुल गांधी आहेत,’ असे तेजस्वी म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, ‘मोदी-नितीश यांनी बिहारला फसवले आहे. ही जुनी-पुराणी सरकार बदलण्याची वेळ आली आहे.’

पंतप्रधान मोदींकडून ‘RSS’ चं कौतुक! त्रास मात्र काँग्रेसला; खासदाराने संघाला दिली ‘तालिबान’ची उपमा

‘प्रत्येक ठिकाणी गुन्हेगार सरकार चालवत आहेत. या सरकारचा बदला घ्यायचा आहे,’ असे म्हणत तेजस्वी यादव यांनी निवडणुकीत मतदारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. तेजस्वी यांनी निवडणूक आयोगालाही इशारा दिला. ‘मोदी, शाह, आणि निवडणूक आयोग यांनी ऐकावे, बिहार लोकशाहीची जननी आहे. येथे राहुल, तेजस्वी आणि महागठबंधन लोकशाहीची हत्या होऊ देणार नाहीत,’ असे ते म्हणाले.

Web Title: Rahul gandhi accuses ec of creating 1 crore voters in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 03:27 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Rahul Gandhi
  • RSS

संबंधित बातम्या

मतचोरीवर संपूर्ण देशामध्ये जोरदार चर्चा; राहुल गांधींचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
1

मतचोरीवर संपूर्ण देशामध्ये जोरदार चर्चा; राहुल गांधींचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा

Vote चोरीचे प्रकरण काँग्रेसवरच पलटणार? चव्हाणांच्या कुटुंबियांनी दुबार-तिबार मतदान केलं? भाजपचा गंभीर आरोप
2

Vote चोरीचे प्रकरण काँग्रेसवरच पलटणार? चव्हाणांच्या कुटुंबियांनी दुबार-तिबार मतदान केलं? भाजपचा गंभीर आरोप

काँग्रेस नेत्याला संघाची प्रार्थना तोंडपाठ; सभागृहात ‘नमस्ते सदा वत्सले…’म्हणताच भाजप नेत्यांच्या आनंदाला उधाण
3

काँग्रेस नेत्याला संघाची प्रार्थना तोंडपाठ; सभागृहात ‘नमस्ते सदा वत्सले…’म्हणताच भाजप नेत्यांच्या आनंदाला उधाण

Ganesh Naik News: पुनर्विकासाच्या नावाखाली लोकांना गोड बोलून घरे पाडतात..: ठाण्यातून गणेश नाईकांचा इशारा
4

Ganesh Naik News: पुनर्विकासाच्या नावाखाली लोकांना गोड बोलून घरे पाडतात..: ठाण्यातून गणेश नाईकांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.