Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बंडोबा थंड होणार की…! उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस

भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुमारे 3 तास चाललेल्या या बैठकीत उपस्थित होते. पक्षाची पर्वा न करता निवडणूक अर्ज भरलेल्या उमेदवारांना शांत करण्याचा प्रयत्न केला जाईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 04, 2024 | 07:50 AM
बंडोबा थंड होणार की...! उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस

बंडोबा थंड होणार की...! उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : विधानसभा निवडणुकीत चांगलीच रंगत येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण, अनेक इच्छुकांनी आपापल्या उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात महाराष्ट्रात बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू असून, सोमवारी अर्थात आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

हेदेखील वाचा : मोठी बातमी ! शरद पवारांना धक्का; ‘या’ नेत्याने सोडली राष्ट्रवादीची साथ, आता करणार…

निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेकजण उमेदवारीसाठी इच्छुक होते. पण, पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल देखील केला आहे. बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी राजकीय पक्षांकडे केवळ एक दिवस उरला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ‘वर्षा’ बंगल्यावर महायुतीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली.

भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुमारे 3 तास चाललेल्या या बैठकीत उपस्थित होते. सूत्रांनुसार, या बैठकीत असे ठरविण्यात आले आहे की, पक्षाची पर्वा न करता निवडणूक अर्ज भरलेल्या उमेदवारांना शांत करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांनी मान्य केल्यास दंड अन्यथा त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. अशा काही उमेदवारांना मुख्यमंत्री समज देतील. शिंदे गटाचे सुमारे 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, नावे मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आहे.

तर महायुतीबाबत बोलायचे झाले तर असे जवळपास 35 नेते बंडखोरी करत मैदानात उतरले आहेत. आता आघाडीचे निवडणूक प्रभारी बंडखोरांची मनधरणी करण्याचा मार्ग शोधत आहेत. त्यांचे अर्ज वेळेत मागे न घेतल्यास निवडणुकीत महायुतीची मोठी अडचण होऊ शकते. त्यामुळे महायुतीकडून बंडखोर नेत्यांची मनधरणी करण्यात येत आहे.

महायुतीत ‘या’ जागांवर तिढा कायम

पाचोरा मतदारसंघातून भाजपचे अमोल शिंदे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहे. बंडखोरीचा पवित्रा घेत अतुल शहा यांनी मुंबादेवी मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. माहीम मतदारसंघावर लक्ष केंद्रीत महायुतीमध्ये सर्वात मोठी अडचण माहीम मतदारसंघात आहे. या मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे निवडणूक लढवत आहे.

हेदेखील वाचा : एका नेत्याची टीका तर दुसऱ्या नेत्याची भेट; अजित पवार गटाची मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत भूमिका तरी काय?

Web Title: Today is the last day to withdraw nomination form nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2024 | 07:50 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • political news

संबंधित बातम्या

पाथरी नगर परिषदेच्या सभागृहात गदारोळ; गैरवर्तन केल्याप्रकरणी बाबाजानी दुर्राणींवर कारवाईचा बडगा
1

पाथरी नगर परिषदेच्या सभागृहात गदारोळ; गैरवर्तन केल्याप्रकरणी बाबाजानी दुर्राणींवर कारवाईचा बडगा

Raghav Chadha आणि AAP मध्ये बिनसलं? पक्षनेतृत्वाला धरले धारेवर; म्हणाले, “माझी शांतता म्हणजे हार नाही..”
2

Raghav Chadha आणि AAP मध्ये बिनसलं? पक्षनेतृत्वाला धरले धारेवर; म्हणाले, “माझी शांतता म्हणजे हार नाही..”

Arvind Sawant : ‘रेल्वे विभागाचा कोकणावर अन्याय’; खासदार अरविंद सावंत यांची  मोठी मागणी
3

Arvind Sawant : ‘रेल्वे विभागाचा कोकणावर अन्याय’; खासदार अरविंद सावंत यांची मोठी मागणी

Assam Election 2026 : आसामच्या निवडणुकीमध्ये AIMIM ची एन्ट्री; असदुद्दीन ओवैसीनी साधला काँग्रेस अन् भाजपवर निशाणा
4

Assam Election 2026 : आसामच्या निवडणुकीमध्ये AIMIM ची एन्ट्री; असदुद्दीन ओवैसीनी साधला काँग्रेस अन् भाजपवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.