
फोटो सौजन्य - Social Media
anshuman vichare ने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने नमूद केले आहे की, “मराठी मातीत राहून माज करायचा नाही! मराठी सगळ्यात आधी!” अंशुमनची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. मराठी मातीमध्ये जन्मून, येथे कमवून आणि इथलं खाऊन, मराठी द्वेष करणाऱ्यांना अंशुमनचे हे खडेबोल चांगलेच टोचले असतील. अंशुमनप्रमाणे शिंदे घराण्यातूनही प्रतिक्रिया आल्याचे समोर आले आहे. गायक उत्कर्ष शिंदेने परप्रांतीयांना चक्क “मराठी शिका! शिकायचे नसल्यास निघा!” या शब्दातच सुनावले आहे.
रितेश देशमुख आणि हेमंत ढोमेनेही दिली प्रतिक्रिया
रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख, महाराष्ट्राची लाडकी वाहिनी ‘लालपरी’चे Brand Ambassdor झाले आहेत. अशामध्ये MSRTC च्या व्यासपीठावर भाष्य करताना रितेशने मंत्री सरनाईकांच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. तसेच “महाराष्ट्रात मराठीच!” असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. तर अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेने ही थेट “आपपल्या राज्यात परत जा! तिथेच कमवा आणि तिथेच खा!” असे सुनावले आहे. मराठी मुद्द्यावरून मराठी सिनेसृष्टी मराठी भाषेसाठी खंबीरपणे उभी असल्याचे दिसून येत आहे.
1 तारखेला लागू होणार नियम!
1 मे रोजी, महाराष्ट्र दिनी राज्यभरात या नियमाची अमलबजावणी होणार असून संपूर्ण राज्यभरात हा निर्णय लागू होणार आहे. महाराष्ट्रात रिक्षा चालवून पोट भरणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा अवगत असणे सक्तीची असणार आहे आणि नसेल तर रिक्षाचालकाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.