Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ayushmann Khurrana: आयुष्मान खुरानाचं मुलांच्या सुरक्षित बालपणासाठी आवाहन; जालन्यात UNICEFच्या कार्यक्रमाला दिली भेट

Ayushmann Khurrana: युनिसेफ इंडियाचे राष्ट्रीय राजदूत आयुष्मान खुराना ने जालन्यातील UNICEFच्या कार्यक्रमाला भेट देत हंगामी स्थलांतराचा परिणाम झालेल्या मुलांशी संवाद साधला.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 20, 2026 | 04:20 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Ayushmann Khurrana : प्रसिद्ध अभिनेता आणि युनिसेफ इंडियाचे राष्ट्रीय राजदूत आयुष्मान खुराना याने महाराष्ट्रातील जालना येथे भेट देत हंगामी स्थलांतराचा परिणाम झालेल्या मुलांसाठी राबवण्यात येणाऱ्या ‘कुटुंब आणि समुदायआधारित काळजी व संरक्षण’ या युनिसेफ कार्यक्रमाची पाहणी केली. यावेळी त्याने मुलांशी, कुटुंबीयांशी आणि स्थानिक समुदायातील सदस्यांशी संवाद साधला.

हंगामी स्थलांतराचा मुलांवर होतोय परिणाम

आर्थिक अडचणींमुळे अनेक कुटुंबांना हंगामी स्थलांतर करावं लागतं. मात्र, या स्थलांतराचा मुलांच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता असते. पालक स्थलांतरित झाल्यानंतर काही मुलं आजी-आजोबा किंवा विस्तारित कुटुंबासोबत मागे राहतात.

अशा परिस्थितीत मुलांना बालमजुरी, बालविवाह, शिक्षणात खंड, कौटुंबिक दुर्लक्ष आणि हिंसाचाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे मुलांना सुरक्षित वातावरण, शिक्षण, आरोग्यसेवा, पोषण आणि मानसिक-सामाजिक आधार मिळणं महत्त्वाचं आहे.

‘कोणत्याही मुलाला बालपण गमवावं लागू नये’

मुलांशी संवाद साधल्यानंतर आयुष्मान खुराना याने सांगितलं की, आर्थिक परिस्थितीमुळे होणारं हंगामी स्थलांतर अनेक कुटुंबांसाठी कठोर वास्तव आहे. मात्र, या परिस्थितीमुळे कोणत्याही मुलाला आपलं बालपण गमवावं लागू नये, असं त्याने म्हटलं.

जालन्यात स्थानिक रहिवासी स्थलांतरित पालकांच्या मुलांना संरक्षण देण्यासाठी आणि त्याने कुटुंबाशी जोडून ठेवण्यासाठी एकत्र काम करत असल्याचं पाहून आनंद झाल्याचंही खुराना याने सांगितलं. हा उपक्रम केवळ मुलांना सुरक्षित घर देत नाही, तर त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून उज्ज्वल भविष्याची आशाही देतो, असं त्याने नमूद केलं.

समुदाय नेते आणि विद्यार्थ्यांशी साधला संवाद

आयुष्मान खुराना याने शंकर आसाराम या तरुण समुदाय नेत्याचीही भेट घेतली. युवा स्वयंसेवक म्हणून केलेल्या कामामुळे शंकर याने स्थानिकांचा विश्वास संपादन केला असून, त्याची एका गावाच्या सरपंचपदी निवड झाली आहे.

तसंच त्याने बारावीत शिकणारी विद्यार्थिनी आणि बालमित्र प्रतिक्षा हिची भेट घेतली. स्थलांतराचा किशोरवयीन मुलींवर होणारा परिणाम तिने जवळून पाहिला आहे.

‘प्रत्येक मुलाला शिकण्याची संधी मिळायला हवी’

बालमित्र हे मुलांसाठी आणि स्थानिकांसाठी विश्वासार्ह आधार असल्याचं खुराना यांनी सांगितलं. मुलांचे हक्क, सुरक्षितता आणि शिक्षण यासाठी बालमित्र महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

बालमजुरी आणि बालविवाह रोखण्यासाठी तसेच मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचंही त्याने सांगितलं. बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, २०१५ ला यावर्षी दहा वर्षे पूर्ण होत असल्याचा उल्लेख करत, संरक्षणात्मक उपाय प्रत्येक मुलापर्यंत पोहोचण्याची गरज त्याने व्यक्त केली.

Shweta Tiwari: ‘तुकाराम मुंढेजी… तुम्ही कुठे आहात?’ श्वेता तिवारीच्या घरी थंड पेयासोबत आलं चक्क जिवंत झुरळ; व्हिडीओ व्हायरल

शिल्पाच्या शिक्षणाचं केलं कौतुक

खुराना यांनी १८ वर्षीय शिल्पाची भेट घेतली. तिला कुटुंबासोबत हंगामी स्थलांतराचा अनुभव आहे. मात्र, तिने शालेय शिक्षण पूर्ण करून आता व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे.

शिक्षणामुळे हंगामी स्थलांतराचं पिढ्यानपिढ्या चालणारं चक्र मोडण्यास मदत होऊ शकते, अशी आशा खुराना यांनी व्यक्त केली. मुलींना योग्य, निरोगी आणि सुरक्षित वातावरण मिळाल्यास त्यांची स्वप्नं नक्की पूर्ण होऊ शकतात, असंही त्यांनी म्हटलं.

आजी-आजोबांसोबत राहणाऱ्या मुलांचीही घेतली भेट

पालकांच्या स्थलांतरानंतर आजोबा आपल्या दोन नातवंडांची काळजी घेत असलेल्या कुटुंबाचीही आयुष्मान खुराना यांनी भेट घेतली. बालमित्र आणि स्थानिकांच्या मदतीमुळे ही मुलं शाळेत जात आहेत. त्यांना आरोग्य, पोषण आणि लसीकरणासारख्या सेवाही मिळत आहेत.

‘प्रत्येक मुलाला सुरक्षित आणि प्रेमळ वातावरणात वाढण्याचा हक्क’

आपल्या जालना भेटीबद्दल बोलताना आयुष्मान खुराना म्हणाला की, “प्रत्येक मुलाला सुरक्षित, प्रेमळ आणि पोषक कौटुंबिक वातावरणात वाढण्याचा हक्क आहे.” सरकार, युनिसेफ, महाराष्ट्र सरकार, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक नागरिक एकत्र येऊन मुलांच्या सुरक्षिततेसाठी काम करत असल्याचा अभिमान वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.

युनिसेफ इंडियाचे उप प्रतिनिधी (कार्यक्रम) यास्पर मोलर यांनीही जालना जिल्ह्यातील या उपक्रमाचं कौतुक केलं. मुलांवरील हिंसाचार रोखता येतो आणि त्यासाठी मुलांच्या आयुष्यातील धोके वेळीच ओळखून कुटुंबांना आवश्यक सेवा उपलब्ध करून देणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

आयुष्मान खुराना आणि यास्पर मोलर यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली. यावेळी मुलं आणि कुटुंबांवर या कार्यक्रमाचा होणारा परिणाम याबाबत चर्चा करण्यात आली.

Lalit Prabhakar-Prajakta Mali: १३ वर्षांनी पुन्हा जुळणार ललित-प्राजक्ताची ‘रेशीमगाठ’; ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’चा टीझर रिलीज

Web Title: Ayushmann khurrana appeal for a safe childhood for children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • Ayushmann Khurrana
  • Entertainemnt News
  • Jalna

संबंधित बातम्या

Tujhya Aayla Movie: ‘तुझ्या आयला’चं मोशन पोस्टर प्रदर्शित; टॅगलाइनने वेधलं लक्ष, सुजय डहाकेच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता वाढली
1

Tujhya Aayla Movie: ‘तुझ्या आयला’चं मोशन पोस्टर प्रदर्शित; टॅगलाइनने वेधलं लक्ष, सुजय डहाकेच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता वाढली

Manoj Bajpayee: महात्मा गांधींच्या आयुष्यातील ते २१ दिवस! मनोज बाजपेयींच्या नव्या भूमिकेने वाढवली सिनेमाची उत्सुकता
2

Manoj Bajpayee: महात्मा गांधींच्या आयुष्यातील ते २१ दिवस! मनोज बाजपेयींच्या नव्या भूमिकेने वाढवली सिनेमाची उत्सुकता

Pushkar Jog: पुष्कर जोग पुन्हा थिरकवणार! ‘हाये रे हाये’ म्युझिक व्हिडीओमध्ये दिसला डान्सिंग स्टारचा हटके अंदाज
3

Pushkar Jog: पुष्कर जोग पुन्हा थिरकवणार! ‘हाये रे हाये’ म्युझिक व्हिडीओमध्ये दिसला डान्सिंग स्टारचा हटके अंदाज

Lalit Prabhakar-Prajakta Mali: १३ वर्षांनी पुन्हा जुळणार ललित-प्राजक्ताची ‘रेशीमगाठ’; ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’चा टीझर रिलीज
4

Lalit Prabhakar-Prajakta Mali: १३ वर्षांनी पुन्हा जुळणार ललित-प्राजक्ताची ‘रेशीमगाठ’; ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’चा टीझर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.