
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Deepika Padukone: ‘चेन्नई एक्सप्रेस’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन १३ वर्षे पूर्ण झाली असली, तरी या चित्रपटातील दीपिका पदुकोणची मीनम्मा आजही प्रेक्षकांच्या आवडत्या पात्रांपैकी एक आहे. खास उच्चार, भन्नाट कॉमिक टायमिंग, भावनिक अभिनय आणि निरागस व्यक्तिमत्त्वामुळे मीनम्माने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली.
शाहरुख खानचा राहुल आणि दीपिकाची मीना ही जोडी बॉलिवूडमधील संस्मरणीय ऑन-स्क्रीन जोड्यांपैकी एक मानली जाते. मात्र या जोडीसोबतच मीनम्माचे मजेशीर आणि भन्नाट डायलॉग्सही प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिले. ‘चेन्नई एक्सप्रेस’ला १३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मीनम्माचे हे पाच आयकॉनिक डायलॉग्स पुन्हा आठवूया.
अमिताभ बच्चन यांच्या ‘कालिया’ चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉगच्या धर्तीवर असलेला हा संवाद मीना राहुलला तिच्या गावात तिच्या वडिलांचा किती दबदबा आहे, हे सांगताना म्हणते. मीनम्माच्या आत्मविश्वासाची झलक दाखवणारा हा डायलॉग चित्रपटाची खास ओळख ठरला.
लग्नातून पळून आलेली मीना राहुलला आत्मविश्वासाने धीर देताना हा संवाद म्हणते. तिचा बेधडक आणि जिंदादिल स्वभाव या एका वाक्यातूनच दिसून येतो. त्यामुळे हा डायलॉग चित्रपटातील सर्वाधिक लोकप्रिय संवादांपैकी एक ठरला.
३. ‘थंगाबली किट्टा वराथे…’
याचा साधा अर्थ म्हणजे ‘थंगाबलीजवळ जाऊ नको.’ चित्रपटातील एका मजेशीर प्रसंगात मीनम्मा हा संवाद म्हणते. झोपेत बोलणारी मीना आणि त्यानंतर राहुलला बेडवरून खाली ढकलण्याचा प्रसंग आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे.
४. ‘कहां से खरीदी ऐसी बकवास डिक्शनरी?’
राहुल आणि मीना यांच्यातील खट्याळ नोकझोक चित्रपटातील विनोदाची रंगत आणखी वाढवते. मीनम्माचा हा संवाद तिच्या आणि राहुलच्या भन्नाट केमिस्ट्रीचे उत्तम उदाहरण आहे. दोघांची सहजस्फूर्त कॉमेडी आणि संवादफेक यामुळे हा प्रसंग आजही चाहत्यांच्या आवडत्या क्षणांपैकी एक आहे.
५. ‘बिना अम्मा अप्पा के तुमने 50 साल निकाल दिए।’
मीनम्माच्या खास शैलीतला हा संवाद तिची निरागसता, विनोदबुद्धी आणि आपुलकी दाखवतो. तिच्या वेगळ्या बोलण्याच्या शैलीमुळे साधा संवादही प्रेक्षकांच्या लक्षात राहतो.
‘चेन्नई एक्सप्रेस’ प्रदर्शित होऊन १३ वर्षे झाली असली, तरी मीनम्मा ही दीपिका पदुकोणच्या सर्वाधिक आयकॉनिक भूमिकांपैकी एक मानली जाते. तिची खास संवादफेक, अचूक कॉमिक टायमिंग आणि निरागस अभिनय यामुळे हे पात्र आजही तितकेच लोकप्रिय आहे.
राहुल-मीनाच्या भन्नाट केमिस्ट्रीमुळे आणि मीनम्माच्या मजेशीर डायलॉग्समुळे ‘चेन्नई एक्सप्रेस’ आजही प्रेक्षकांच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. विविध पिढ्यांतील प्रेक्षकांना आजही हा चित्रपट आणि त्यातील मीनम्मा तितकीच मनोरंजक वाटते.
Amey Wagh: TVFचा पहिला मराठी चित्रपट जाहीर; अमेय वाघसह ‘या’ कलाकारांची फौज, नावही भन्नाट!