(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मुंबईत जेन-झी आणि जेन-अल्फा पिढीशी संवाद साधल्यानंतर माध्यमांनी कंगनाला याबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “जेन-अल्फा आणि जेन-झी हे देशाचाच एक भाग आहेत. जेन-झीच्या जनादेशामुळेच आम्ही इतकी वर्षे सत्तेत आहोत.”
कंगनाने पुढे असेही सांगितले की, सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या काही व्यक्तींच्या वर्तनावरून संपूर्ण तरुण पिढीचा न्याय करू नये. तिच्या मते, काही मोजक्या लोकांमुळे संपूर्ण जेन-झीची प्रतिमा खराब होत आहे.
Delhi: On RSS chief Mohan Bhagwat’s statement on Gen Z, BJP MP Kangana Ranaut says, “Gen Z is the strength of our country and, in a way, a very big heritage of our country. Mohan Bhagwat ji is highly respected, and we have had the opportunity to listen to his wisdom and… pic.twitter.com/c24oiTwYnq — IANS (@ians_india) August 7, 2026
मुसळधार पावसातही माध्यमांशी संवाद साधताना कंगनाने विरोधकांवर टीका केली. आंदोलनादरम्यान शिवीगाळ करणारे किंवा आक्षेपार्ह वर्तन करणारे केवळ काही लोक असल्याचे ती म्हणाली. तसेच झारखंडमधील शांततापूर्ण आंदोलनांचे उदाहरण देत अनेक तरुणांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदके जिंकून ती देशाला आणि पंतप्रधानांना समर्पित केल्याचेही तिने नमूद केले.
पर्यावरण आणि वृक्षारोपणासारख्या सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असलेल्या तरुणांचाही उल्लेख करत कंगना म्हणाली की, “जेन-झी ही आमची सर्वात मोठी ताकद आहे आणि आम्हाला आमच्या तरुणांचा अभिमान आहे.”
यापूर्वी विद्यार्थी आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंवर प्रतिक्रिया देताना कंगनाने काही आंदोलक तरुणांना “जनरेशन गटर” असे संबोधले होते. या वक्तव्यामुळे सोशल मीडियापासून संसदेतही मोठा वाद निर्माण झाला होता आणि तिच्यावर जोरदार टीका झाली होती.
वाद वाढल्यानंतर कंगना रनौतने स्पष्टीकरण देत सांगितले की, तिची टीका संपूर्ण जेन-झी पिढीवर नव्हती, तर अयोग्य सार्वजनिक वर्तन करणाऱ्या काही व्यक्तींवर होती. देशासाठी सकारात्मक योगदान देणाऱ्या तरुणांचे आपण नेहमीच कौतुक करत असल्याचेही तिने स्पष्ट केले.






