
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Marathi Bhakti Geet: विठ्ठलभक्तीचा सुगंध दरवळवणारं ‘पालखी निघाली वारीला’ हे नवं भक्तिगीत संगीतप्रेमींच्या भेटीला आलं आहे. या गीताला ग्रॅमी पुरस्कार विजेते आणि पद्मश्री शंकर महादेवन तसेच मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सन्मानित गायिका रीवा राठोड यांनी आपल्या सुरेल आवाजाने सजवलं आहे.
या गीताचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ गायक-संगीतकार रूपकुमार राठोड आणि गायिका सुनाली राठोड यांची कन्या रीवा राठोड हिने याच गाण्यातून मराठी गायनात पदार्पण केलं आहे. तिच्या या सुरेल प्रवासाबद्दल रूपकुमार राठोड यांनीही आनंद व्यक्त करत मुलीच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे.
‘पालखी निघाली वारीला’ या भक्तिगीताला ज्येष्ठ संगीतकार रूपकुमार राठोड यांनी संगीत दिलं असून, डॉ. दीपक वझे यांनी विठ्ठलभक्ती, वारकरी परंपरा आणि श्रद्धेचं सार प्रभावी शब्दांत मांडलं आहे. या गाण्याची ध्वनिचित्रफीत सौ. श्वेता परुळकर यांनी दिग्दर्शित केली असून, हे भक्तिगीत DFF प्रस्तुत करत आहे. शंकर महादेवन आणि रीवा राठोड यांच्या आवाजातील हे भक्तिगीत वारकरी परंपरेचा भावस्पर्शी अनुभव देत असून, विठ्ठलभक्तांच्या मनाला नक्कीच भावेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
Gautami Kapoor Apology : ’चुकीच्या पद्धतीने स्पर्श..’, पतीच्या गैरवर्तनानंतर Gautami Kapoorने मागितली माफी, अभिनेत्रीसमोर जोडले हात
आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर प्रदर्शित झालेलं ‘पालखी निघाली वारीला’ हे भक्तिगीत वारकरी संप्रदायातील भक्तिभाव, समता, एकात्मता आणि अध्यात्माचा संदेश प्रभावीपणे मांडतं. ‘विठ्ठल… विठ्ठल…’ या अखंड नामस्मरणाने सजलेलं हे गीत पालखी सोहळ्याचं दिव्य आणि भावस्पर्शी दर्शन घडवतं. विठ्ठलभक्तीचा गहिरा भाव जागवणारं हे गीत प्रत्येक भाविकाच्या अंतःकरणात श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जेची ज्योत प्रज्वलित करत वारीच्या पवित्र परंपरेचा अनुभव देतं.