
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
sangram samel: मनोरंजनविश्वातील कलाकारांचं आयुष्य बाहेरून जितकं ग्लॅमरस आणि सुखी दिसतं, तितकंच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आणि वेदनादायी अनुभव दडलेले असतात. पडद्यावर कायम हसतमुख राहून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे हे कलाकार अनेकदा स्वतःच्या दुःखावर पडदा टाकत काम करत असतात. मनात भावनांचं वादळ सुरू असतानाही कॅमेऱ्यासमोर हसत उभं राहण्याची वेळ त्यांच्यावर येते. अशाच एका कठीण प्रसंगाचा खुलासा अभिनेता संग्राम समेळने नुकताच केला असून, त्याच्या आयुष्यातील हा भावनिक अनुभव ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.
संग्राम कोणत्या भूमिकेमुळे नाही तर सध्या तो त्याच्या आयुष्यातील धक्कादायक प्रसंगामुळे चर्चेत आहे. अलिकडेच अभिनेत्याने कलाकार या युट्यूब चॅनेलाल मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने पहिल्यांदाच त्याच्या आयुष्यातील काही खुलासे केले आहेत.
या मुलाखतीत दरम्यान त्याला विचारण्यात आले की, असं कधी घडलाय का, की तुझ्या आयुष्यात खूप दुःख असतानाही हसून लोकांना सामोरे जाण्याची वेळ त्याच्यावर कधी आली आहे का ? यावर उत्तर देताना अभिनेता म्हणाला, प्रत्येक अभिनेत्याच्या जीवनात असा प्रसंग नक्कीच येतो.
या संदर्भात त्याने २०१४ मधील एक अत्यंत कटू आठवण चाहत्यांसोबत शेअर केली. पुढे संग्राम म्हणाला, ” मला एक किस्सा कायम लक्षात राहील, 2014 ची गोष्ट आहे. जेव्हा माझी पुढचं पाऊल ही मालिका सुरू होती. त्यावेळी हर्षदाताई, मृणालताई यांनी मला शिकवलं की, जे आपलं युनिट असतं, ते आपलं कुटुंब असते. त्या मालिकेच्या वेळी त्यांनी मला आधार दिला. 2014 ला माझा साखरपुडा मोडला. माझं 15 वर्षांचे रिलेशनशिप होते. आमचं एका कॉलवर नातं मोडलं आहे. मुलगी आणि तिच्या घरचे माझ्या घरी येणार होते. सगळी देणी- घेणी परत करायचं होतं. माझं त्याच दिवशी शूटिंग होते. मी सुट्टी घेतली नाही. कारण सगळ संपलंच आहे, तर घरी बसून काय करू? त्याच दिवशी मालिकेच्या सेटवर त्याला डान्स सीक्वेन्सचं शूटिंग करायचं होतं. वैयक्तिक आयुष्यात मोठं वादळ सुरू असताना कॅमेऱ्यासमोर हसून अभिनय करणं त्याच्यासाठी अत्यंत कठीण होतं. त्यातच, “मला डान्स येत नाही,” अशी भीतीही त्याच्या मनात होती. त्यामुळे वैयक्तिक आयुष्याचं दुःख आणि शूटिंगचं दडपण अशा दुहेरी तणावाला त्याला सामोरं जावं लागलं.
मात्र, मालिकेच्या टीमने त्याची खंबीर साथ दिली. सहकलाकार अभिजीत केळकरसह संपूर्ण टीम त्याला सतत प्रोत्साहन देत होती. सेटवरील वातावरण हलकंफुलकं ठेवण्यासाठी ते विनोद करत होते, जेणेकरून त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि तो त्या प्रसंगातून सावरू शकेल. “ते माझ्यासाठी कुटुंबासारखेच होते. त्यांनी मला त्या कठीण दिवसातून बाहेर पडण्याची ताकद दिली. त्यामुळे तो दिवस आणि त्यांची साथ मी आयुष्यभर विसरणार नाही,” अशी भावना सागर समेळने व्यक्त केली.