
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी अभिनेत्री भाग्यश्री न्हालवे हि अनेक मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचली आहे. भाग्यश्रीचे ५ महिन्यांपूर्वी लग्न झाले असून. मागील काही महिन्यांपासून भाग्यश्री तिच्या कामामुळे नाही, तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. लग्नानंतर अवघ्या महिन्याभरातच तिच्या आईचे निधन झालं. आईच्या इच्छेप्रमाणे भाग्यश्रीने अरेंज मॅरेज केलं होते. तिच्या लग्नाला पाच महिने पूर्ण झाले असून भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवप एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने तिच्या पतीचे कौतुक केलं आहे.
भाग्यश्री न्हालवेची पोस्ट
भाग्यश्रीने पोस्टमध्ये लिहिले, ”प्रिय नवरोबा, आज आपल्या लग्नाला ५ महिने पूर्ण होत आहेत आणि माझ्या आईला जाऊन ४ महिने… या 20 व्या शतकात आपण टिपिकल अरेंज maarige केलं…..सगळ्या परिस्थितीत तू मला खंबीरपणे साथ दिलीस…कोणत्याही कंप्लेंट शिवाय मला सांभाळून घेतलास… तुझ्या सारखा निस्वार्थी तूच… कोणताही पुरुषी ego तू आपल्या नात्यात कधी आणला नाहीस… माझ्या आयुष्यातील एक सगळ्यात प्रेमळ व्यक्ती आहेस तू… सगळ्या परिस्थितीत तू मला कायम हसवलस…लग्न गडबडीत झाल.. काय झालं कधी झालं कसं झालं… हे मला कळन्याआधी तू मला पूर्ण पणे मला स्वीकारलस….देवाने मला दिलेल एक सुंदर गिफ्ट आहेस तू.. I love you my नवरोबा.. खुप फोटो अपलोड करायचे राहून गेलेत… आता सुरुवात करते…. Happy 5-month wedding anniversary my dear Navroba.” अशी पोस्ट अभिनेत्री भाग्यश्री न्हालवेने केली आहे.
भाग्यश्री न्हालवेच्या पतीचं नाव उदय कुंडप आहे. उदय हा डॉक्टर आहे. भाग्यश्रीने उदयबरोबरचे देवदर्शनाचे काही फोटो पोस्ट करत तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.गडबडीत लग्न झालं तरी तू सांभाळून घेतलंस, नात्यात पुरूषी अहंकार येई दिला नाहीस, तू देवाने दिलेलं गिफ्ट आहेस, असं भाग्यश्रीने पती उदयबद्दल म्हटलंय.
दरम्यान, दरम्यान, भाग्यश्री न्हालवे हिने २ डिसेंबर २०२५ रोजी उदय कुंडपशी लग्न केलं. लग्नानंतर ती पतीसोबत मलेशियाला गेली होती. त्याच काळात तिच्या आईचं ३० जानेवारी रोजी पुण्यात निधन झालं. त्यानंतर तिने एक भावनिक पोस्ट शेअर केली होती.
ती म्हणाली होती, “महाराष्ट्रात नवीन लग्न झालेली मुलगी वर्षभर नववधू असते. पहिल्या वर्षातील सगळे सण तिचे असतात. नव्या लग्नाचे नऊ महिनेही पूर्ण झाले नव्हते. माझ्या बाबतीत ते सगळं घडण्याआधीच मला आईच्या तेराव्याचं जेवण करावं लागलं. प्रत्येक घासासोबत तू माझ्या डोळ्यांतील अश्रूंमध्ये तरंगत होतीस. मनातल्या मनात मी तुला विचारत होते—यासाठीच का तू मला सौभाग्यवती केलंस?”