फोटो सौजन्य - Social Media
अशामध्ये एक सुप्रसिद्ध ऐतिहासिक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. याची बातमी स्वतः मालिकेच्या अभिनेत्याने दिली आहे. अभिनेता व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या सोशल माध्यमांवर ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका निरोप घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी “मालिका संपतेय पण गोष्ट सुरूच राहणार!” असे नमूद केले आहे.
‘ही’ मालिका घेतेय प्रेक्षकांचा निरोप!
डॉ. अमोल कोल्हे स्टारर मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेच्या बंद होण्याच्या चर्चा सुरु होत्या. काही वृत्तांनी मालिका पुढील 3 महिन्यात बंद होईल असे जाहीर केले होते. परंतु, अमोल कोल्हेंनी शेवटी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. स्टार प्रवाह ची ऐतिहासिक मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ आता Off Air जात आहे.
गौरी इंगवलेचं पदार्पण!
‘पाठराखीण’ या मालिकेतून गौरी इंगवले मालिका क्षेत्रात पदार्पण करत आहे. ‘पाठराखीण’ या मालिकेचा प्रसार संध्याकाळी 9 वाजता केला जातो.






