
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
झी मराठीवरील तारिणी मालिकेत सध्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तारिणी आणि केदार यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण अखेर आला असून त्यांच्या लग्नसोहळ्याला सुरुवात झाली आहे. लग्नाचे सर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडत आहेत.तरी हा सोहळा साधा-सोप्या आनंदापुरता मर्यादित राहणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे. प्रत्येक विधीमध्ये नवे ट्विस्ट, थरार आणि नाट्यमय घडामोडींचा भडिमार होताना दिसत आहे.
दरम्यान, या लग्नात सर्वात मोठा धक्का म्हणजे युवराजने रचलेला गुप्त प्लॅन. तो बापुराव जामखंडे यांची भेट घेतो आणि दोघे मिळून असा कट रचतात की, या आनंदाच्या वातावरणात लग्नाऐवजी सुतक पसरलं पाहिजे. त्यांच्या या कटामुळे संपूर्ण सोहळ्यावर संकटाचं सावट निर्माण झालं आहे.
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
लग्नाचा पहिला सोहळा असलेल्या मेहंदीमध्येही अडथळे येताना दिसत आहेत. इशा आणि निशी या दोघी तारिणीच्या मेहंदीमध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांचा हा डाव यशस्वी होणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.याच वेळी, तारिणीच्या बाजूनेही खेळी सुरू आहे. “टीम तारिणी” वेगवेगळ्या वेशात लग्नात दाखल झाली आहे. कोणी फोटोग्राफर, कोणी इव्हेंट मॅनेजमेंट तर कोणी कॅटरिंग स्टाफ बनून. त्यामुळे या लग्नात प्रत्येक कोपऱ्यात काही ना काही गुपित दडलं आहे.
दरम्यान, सर्वात धक्कादायक घटना कौशिकीच्या रूममध्ये घडते. तिथे कोणीतरी जीवघेणा गॅस सोडलेला असतो. पण नशिबाचा खेळ असा की, त्या खोलीत कौशिकी नसून तारिणी असते. याच क्षणी तारिणीला कळतं की हा सगळा कट कौशिकीला मारण्यासाठी रचलेला आहे.
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मेहंदीतील गोंधळानंतर “टीम तारिणी” सतर्क झाली असून, प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत आहे.दरम्यान, संगीत सोहळा मात्र पूर्ण जल्लोषात रंगणार आहे. घरातील सगळे सदस्य डान्स परफॉर्मन्स देताना दिसणार आहेत. सुमी आज्जी ‘सामी-सामी’ गाण्यावर ठेका धरताना दिसणार, तर काव्या आणि नमाचा डान्सही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहे. या सगळ्यात खास आकर्षण ठरणार आहे अभिनेता ललित प्रभाकरचा धमाकेदार परफॉर्मन्स. कौशिकीचा खास पाहुणा म्हणून ते या सोहळ्यात हजेरी लावणार असून, तारिणी-केदारला शुभेच्छाही देणार आहेत. याशिवाय, टॉर्च लाईटमध्ये सादर होणारा तारिणी आणि केदारचा रोमँटिक डान्स हा देखील एक वेगळाच अनुभव ठरणार आहे.मात्र, आनंदाच्या या वातावरणातही संकटाची छाया कायम आहे. संगीत आणि हळदी या दोन्ही सोहळ्यांमध्ये कौशिकीवर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न होत असल्यामुळे तणाव वाढत आहे. आणि सगळ्यात मोठा धक्का म्हणजे लग्नाच्या दिवशी तारिणी गौरीहार पूजा करत असतानातिला कळतं की कौशिकीचं अपहरण झालं आहे.
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कर्तव्याला सर्वात प्राधान्य देणारे तारिणी आणि केदार यांच्यासाठी हा क्षण अत्यंत निर्णायक ठरतो. लग्नाच्या पोशाखातच ते कौशिकीला वाचवण्यासाठी धाव घेतात. त्यामुळे लग्नसोहळा आणि मिशन या दोन्हींची लढत आता एकाच वेळी सुरू होते.या सगळ्या नाट्यमय घडामोडींमध्ये, डोलीतून होणारी तारिणीची धडाकेबाज एंट्री प्रेक्षकांसाठी एक भव्य आणि अविस्मरणीय क्षण ठरणार आहे.आता प्रश्न एकच तारिणी-केदार लग्न पूर्ण करतील का, की आधी मिशन पूर्ण करणार? आणि कौशिकी सुरक्षित परत येणार का? या थरारक वळणांमुळे हा लग्नसोहळा प्रेक्षकांना खिळवून ठेवणार, हे नक्की