
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अमोल कोल्हे आणि मुधराणी प्रभुलकर यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही मालिका येत्या १४ जून रोजी बंद होणार असून अवघ्या पाच महिन्यांतच ती संपुष्टात येत आहे.
मालिका इतक्या लवकर बंद होत असल्यामुळे अभिनेता Amol Kolhe यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी मालिकेचा प्रवास लवकर संपत असल्याबद्दल खंत व्यक्त करत, “मालिका संपतेय पण गोष्ट मात्र सुरुच राहणार” असेही प्रेक्षकांना सांगितले.
या मालिकेत Madhurani Prabhulkar देखील प्रमुख भूमिकेत आहे. ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कथानकावर आधारित ही मालिका कमी कालावधीतच संपणार असल्याने प्रेक्षकांमध्येही चर्चा सुरू आहे.
मालिका अवघ्या १५२ भागांमध्ये संपतेय हे दुर्देव आहे. पण, ही गोष्ट इथेच थांबणार नाही. एक वेगळ्या मंचावर प्रेक्षकांना ही गोष्ट पाहायला मिळेल, असं डॉ. अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलं आहे. याबाबत सोशल मीडियावर सुद्धा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मात्र, याचदरम्यान एक वेगळी अपडेट समोर आली आहे.
झी मराठी वाहिनीने एक प्रोमो शेअर केला आहे.हा प्रोमो अमोल कोल्हेंच्या स्वराज्यरक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकेचा आहे. जी पुन:प्रसारित केली जाणार आहे. झी मराठी वाहिनीने याबाबत अधिकृत प्रोमो शेअर करत ही माहिती दिली आहे.
ही मालिका सप्टेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत झी मराठीवर रात्री ९ वाजता प्राइम टाइममध्ये प्रसारित झाली होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि संघर्षावर आधारित या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या माध्यमातून संभाजी महाराजांची इतिहासगाथा घराघरांत पोहोचली.
आता ही मालिका पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, येत्या ८ जूनपासून ती दररोज सायंकाळी ६ वाजता दाखवली जाणार आहे. ही मालिका Zee Marathi वर पुन्हा सुरू होत असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका Chhatrapati Sambhaji Maharaj यांच्या जीवनावर आधारित असल्यामुळे ही मालिका पुन्हा पाहण्याची संधी मिळणार असल्याने प्रेक्षकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.
दमदार कलाकारांचा प्रभावी अभिनय
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका Amol Kolhe यांनी साकारली होती. त्यांच्या दमदार अभिनयामुळे ही भूमिका विशेष गाजली होती.महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री Prajakta Gaikwad झळकली होती. तिच्या अभिनयालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
या मालिकेत याशिवाय अनेक अनुभवी आणि लोकप्रिय कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. त्यामध्ये Shantanu Moghe, Pratiksha Lonkar, Ashwini Mahangade, Poorva Gokhale, Snehalata Vasaikar, Pallavi Vaideya, Amit Behl आणि Amit BhanuShali यांचा समावेश होता.