
घरोघरी मातीच्या चुली मालिकेत आता सगळ्यात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.या प्रोमोनुसार नाना हे जग सोडून गेले असं दाखवण्यात आलं आहे. नानांना फोटोला हार घालणयात आला. त्यावेळी संपूर्ण रणदिवे कुटुंब तिथे उपस्थित होतं. यावेळी नानांच्या मृत्यूपत्राची देखील चर्चा झाली. त्यावेळी तिथे असलेल्या एका वकिलाने सांगितलं की, नानांनी घर, सगळ्या इनवेस्टमेंट आणि शेती हे सगळं जानकी रणदिवे यांच्या नावावर केलं आहे. त्यात नानांनी असं देखील म्हटलं की ही सगळी संपत्ती जानकी कोणाच्या ही नवावर करु शकत नाही. हे सगळं ऐकून घरच्य़ांना खूप मोठा धक्का बसतो. प्रॉपर्टीचा हिस्सा आपल्याला मिळावा यासाठी आलेली शर्वरी नानांचं मृत्यूपत्राचं वाचन ऐकून रागावते. संतापलेली शरयु कुटुंबातील प्रत्येकाला जानकीच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करते.
Tharala Tar Mag : सायलीच तन्वी असल्याचं सत्य होणार का उघड? ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट
शरयु म्हणते की मान्य आहे की, जानकी वहिनीने घरासाठी खूप काही केलं पण सगळी प्रॉपर्टी तिच्याच नावे का ? नानांनी प्रॉपर्टीचा एकही हिस्सा आईच्या नावे का नाही ठेवला ? हे मृत्यूपत्र खरंच नानांनी लिहिलं की कोणी स्वत:च्य़ा स्वार्थासाठी डाव खेळत आहे असा सवाल करत तिने घरच्यांच्या मनात जानकी विषयी विष पेरायवला सुरुवात केली. मालिकेचा हा भाग प्रेक्षकांना 24आणि 25 मे रोजी पाहता येणार आहे. आता या सगळ्या संकटातून जानकी घराला कसं वाचवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.