
Marathi Actress: "लग्नानंतर सासरी प्रचंड त्रास...' (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
त्यावेळी त्या म्हणाल्या की, शूटिंगसाठी सकाळपासून रात्रीपर्यंत घराबाहेर राहावं लागायचं त्यात मुंबईतील वाहतूक आणि लांबचा प्रवास यामुळे दिवसातील मोठा वेळ कामातच जायचा. परिणामी घरात वेळ असल्याने सुरुवातीच्या काळात सासरच्या मंडळींना हे पटत नव्हतं. त्यांच्या दृष्टीने नोकरी म्हणजे ठराविक वेळेची असते. अभिनय क्षेत्रात मात्र दिवसाचे १२ ते १३ तास सहज जातात, हे त्यांना माहीत नव्हतं.
या कारणामुळे सुरुवातीचे काही दिवस त्यांच्यासाठी तणावाचे ठरले. वारंवार घराबाहेर राहण्याबद्दल प्रश्न विचारले जायचे. मात्र त्यांनी कधीही संयम सोडला नाही. आपल्या कामाचं महत्त्व आणि त्यामागची मेहनत घरच्यांना समजावून सांगण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला.
काळ पुढे सरकत गेला आणि हळूहळू घरच्यांनाही अभिनय क्षेत्राचं वास्तव समजू लागलं. शूटिंगचे तास, प्रवास आणि कलाकारांचं व्यस्त आयुष्य त्यांनी जवळून पाहिलं. त्यानंतर परिस्थिती बदलली. कुटुंबीयांचा पाठिंबा मिळू लागला आणि घरातील वातावरणही सकारात्मक झालं.
आज अनेक महिला करिअर आणि संसार दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत आहेत. मात्र त्यासाठी त्यांना अनेकदा स्वतःच्या आवडी-निवडी बाजूला ठेवाव्या लागतात. कलाकारांचं आयुष्य बाहेरून जितकं आकर्षक दिसतं, तितकंच त्यामागे मेहनत, त्याग आणि संघर्ष दडलेला असतो. किशोरी गोडबोले यांचा अनुभवही याच गोष्टीची जाणीव करून देतो.
अभिनेत्री किशोरी गोडबोले यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अनेक चित्रपट आणि मालिकांच्या माध्यामांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तसेच ती सोशलमीडियाला सुद्धा सक्रिय आहे.