
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सोशल मीडियावर ‘प्रसिका’ म्हणून लोकप्रिय असलेल्या Prasad Vedpathak आणि Deepika Vedpathak या दाम्पत्याचा मोठा चाहता वर्ग आहे. “नमस्कार मंडळी, या जेवायला…” या त्यांच्या खास शैलीमुळे ते महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचले आहेत. खाद्यसंस्कृती, कौटुंबिक जीवनशैली आणि दैनंदिन अनुभवांवर आधारित त्यांच्या व्हिडीओंना सोशल मीडियावर मोठी पसंती मिळते. त्यामुळे ‘प्रसिका’ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या प्रत्येक पोस्ट आणि व्हिडीओची चाहत्यांमध्ये उत्सुकता असते.
मात्र, नुकताच Prasad Vedpathak ने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.Prasad Vedpathak ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आपल्या सोसायटीतील एका प्रकाराबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.
प्रसाद वेदपाठकची पोस्ट
पोस्टमध्ये तो म्हणाला, “हा व्हिडिओ खास माझ्या जैन फॉलोअर्स आणि जैन मित्रांसाठी केला आहे. आज ही पांढरी पट्टी रस्त्यापासून माझ्या घरापर्यंत कोणतीही परवानगी न घेता काढण्यात आली आहे. माझा प्रश्न हा आहे की, यामागचं नेमकं लॉजिक काय आहे? हा ऑइल पेंट आहे, जो सहज निघणार नाही. तुम्ही जैन धर्माचे पालन करत असाल, जैन धर्म हा खूप चांगला धर्म आहे, पण मला या मागचं कारण जाणून घ्यायचं आहे.”
पुढे त्याने प्रश्न उपस्थित करत म्हटले, “असं आहे का की साधू-संतांनी सांगितलं आहे की अशी व्यवस्था नसेल तर आम्ही तुमच्या घरी येणार नाही? तुम्हाला हे चुकीचं वाटत नाही का? हा माझा प्रश्न आहे. कृपया तुमचं मत मला सांगा.”
यासोबतच त्याने एक उदाहरण देत म्हटले, “उद्या जर मी केशरी रंगाची पट्टी काढली, दुसऱ्या कुणी हिरवी किंवा निळी पट्टी काढली, किंवा रेड कार्पेट टाकलं आणि म्हटलं की असं नसेल तर मी तुमच्या घरी येणार नाही, तर ते योग्य ठरेल का? कृपया यावर कमेंट करून तुमचं मत सांगा.”
Jain Jihad ! pic.twitter.com/vBeqvV35LR — Prasad Vedpathak (@prasadvedpathak) June 4, 2026
या व्हिडिओद्वारे प्रसाद वेदपाठक ने संबंधित प्रथेच्या मागील कारणांबाबत प्रश्न उपस्थित केला असून, सोशल मीडियावर या विषयावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. त्यांच्या या पोस्टमुळे चर्चेला उधाण आले असून अनेकजण आपापली मतं व्यक्त करत आहेत.
या प्रकारामुळे त्याने असंतोष व्यक्त केला असून, या घटनेला त्याने “जैन जिहाद” असे संबोधले आहे. त्याच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.दरम्यान, संबंधित सोसायटी प्रशासन किंवा इतर रहिवाशांकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सोशल मीडियावर मात्र या विषयावर चर्चा सुरू आहे.
याआधीही प्रसाद वेदपाठक राहिला होता चर्चेत ?
कोणत्याही प्रकारचे ‘कम्युनिटी गाईडलाईन्स’चे उल्लंघन न केलेले नसतानाही (असा प्रसादाचा दावा आहे), रातोरात त्यांची १० वर्षांची मेहनत असणारी सर्व सोशल खाती प्लॅटफॉर्म्सवरून गायब झाली. त्यानंतर या कारवाईमुळे हतबल झालेल्या प्रसादनं, “जर माझ्या किंवा माझ्या पत्नीचं बरं-वाईट झालं, तर याला हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच जबाबदार असतील,” अशी संतप्त पोस्ट शेअर करत सोशल मीडिया कंपन्यांना तंबी दिली होती. तर, “नमस्कार मंडळी, सर्वांनी जेवायला या!” या त्यांच्या सिग्नेचर डायलॉगमुळे ते महाराष्ट्रातील घराघरांत लोकप्रिय होते. त्यांची सर्व खाती बंद झाल्यामुळे त्यांच्या लाखो चाहत्यांनीही सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला होता.