
एसीबीची देशभरात १५ ठिकाणी छापेमारी
जल जीवन मिशन प्रकरणाशी निगडीत तपास
तब्बल ९ लोकांना ताब्यात घेतल्याची माहीती
राजस्थान: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) देशभराती १५ ठिकाणी छापेमारी केल्याचे समोर येत आहे. राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये एसीबीने जल जीवन मिशन घोटाळ्याप्रकरणी छापेमारी सुरू केली आहे. एसीबीने ही कारवाई जयपूर, बाडमेर, सिकर, जालोर, दिल्ली, बिहार आणि झारखंडमध्ये एकाच वेळेस १५ ठिकाणी छापेमारी केली जात आहे.
निवृत्त आयपीएस अधिकारी सुबोध अग्रवाल यांच्या संबंधित ठिकाणी देखील एसीबीने छापेमारी केली आहे. एकाच वेळेस १५ ठिकाणी एसीबीने ही छापेमारी केली आहे. त्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. सकाळपासून ही कारवाई सुरू असल्याचे समोर आले आहे. ६ पेक्षा जास्त आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे.
ही संपूर्ण कारवाई एसीबीचे डिजी गोविंद गुप्ता आणि एडिजी स्मिता श्रीवास्तव यांच्या नेतृत्वात सुरू आहे. डीआयजी डॉ. रामेश्वर सिंह आणि एसपी पुष्पेंद्र सिंह राठोड हे देखील या कारवाईत सहभागी आहेत. एसपी पुष्पेंद्र सिंह राठोड हे जल जीवन मिशनचा तपास सुरू असलेल्या एसआयटीचे अध्यक्ष देखील आहेत.
ACB ची मोठी कारवाई; 95 हजारांची लाच घेताना पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस अटकेत
किती जणांना अटक?
एसीबीने देशभरात १५ ठिकाणी छापेमारी केली आहे. जल जीवन मिशन अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ९ जणांना अटक करण्यात आली आहे.
मी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देईन- झिरवाळ
ज्याच्या मंत्रिमंडळाच्या इमारतीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी कारवाई केली. यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनातील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आले आहे. ही लाच स्वीकारताना संबंधित लिपीकाला रंगेहात पकडल्यामुळे मंत्रीमंडळात खळबळ उडाली. यामुळे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर देखील ताशेरे ओढले जाऊ लागले. दरम्यान, या प्रकरणावर नरहरी झिरवाळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
एसीबीने रंगेहात लाच घेताना पकडल्यानंतर नरहरी झिरवाळ यांचे कार्यालय सील केले आहे. या लाचेच्या व्यवहाराचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास सुरू केला आहे. त्यामुळे कार्यालय सील करण्यात आले आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या लिपिकाने सुरुवातीच्या चौकशीत काही धक्कादायक नावे घेतल्याची चर्चा आहे. ज्यामुळे मंत्र्यांचे खासगी सचिवही संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे बोललं जात आहे. यामुळे नरहरी झिरवाळ यांच्यावर देखील निशाणा साधला जात आहे.