Bihar Elections 2025:
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएमध्ये जागावाटप जवळजवळ निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आणि जेडीयूमध्ये जागांवर समन्वय झाला असून दोन्ही पक्ष समान जागांवर निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती समोर आली आहे. तर चिराग पासवान यांच्या एलजेपी पक्षाने ४० जागांची मागणी केली आहे. ६-७ विधानसभा जागा एचएएम पक्ष आणि उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षाच्या खात्यात जाऊ शकतात. असेही सांगितले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेडीयू आणि भाजप १०० ते १०५ जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूने ११५ जागांवर आणि भाजपने ११० जागांवर तर त्यावेळी एनडीएचा भाग असलेल्या व्हीआयपीने ११ आणि एचएएमने ७ जागा लढवल्या होत्या. तर एनडीएसोबत नसलेल्या एलजेपी पक्षाने १३५ जागांवर निवडणूक लढवली होती. पण १३५ पैकी त्यांना फक्त एकच जागा जिंकता आली. भाजपने ७४ जागा जिंकल्या, तर जेडीयूने ४३ जागांवर विजय मिळवला. पण यावेळी जेडीयू १०० पेक्षा कमी जागांवर सहमत होणार नसल्याचे सांगितले जात आहे.
दुसरीकडे चिराग पासवान यांचा पक्ष लोक जनशक्ती पार्टी ४० जागांची मागणी करत आहे. पण त्यांना फक्त २० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर उरलेल्या जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चा या पक्षांना दिल्या जाऊ शकतात. जर मुकेश साहनी यांचा पक्ष व्हीआयपी, जो सध्या आरजेडी-काँग्रेस महाआघाडीचा भाग असलेल्या मुकेश साहनी यांच्या व्हीआयपी पक्ष आाघाडीतून बाहेर पडला तर समीकरणे बदलू शकतात.
‘एकदिवसीय क्रिकेट थांबवा, ऑलिंपिकवर लक्ष द्या…’, ललित मोदींचा ICC ला अजब सल्ला; पहा VIDEO
एनडीएच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, गेल्या वेळी लोजपामुळे जेडीयूची कामगिरी खराब झाली होती. सध्या जेडीयुकडे बिहारमधील सुमारे १०% मते आहेत. यात विशेषतः अत्यंत मागासवर्गीय (ईबीसी) वर्गाची सर्वाधिक मते आहेत. ही निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे. यावेळी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याकडे पक्षाचे पूर्ण लक्ष असणार आहे.
जेडीयु नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघात ज्या पक्षाची आघाडी आहे त्याला किमान तेवढ्या जागा मिळाव्यात असा युक्तिवाद केला जात आहे. काही एनडीए घटक पक्षांनाकडूनही स्ट्राइक रेटनुसार जागावाटप झाले पाहिज, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.