Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भाजपचे लोक घाबरट’; पंतप्रधान मोदींसह भाजपवर हल्लाबोल, जाणून घ्या काय म्हणाले राहुल गांधी?

गेल्या 145 दिवसांपासून सुरु असलेल्या काँग्रेसच्या 'भारत जोडो' यात्रेचा (Bharat Jodo Yatra) समारोप आज झाला. यावेळी झालेल्या भाषणात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 30, 2023 | 03:42 PM
‘भाजपचे लोक घाबरट’; पंतप्रधान मोदींसह भाजपवर हल्लाबोल, जाणून घ्या काय म्हणाले राहुल गांधी?
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या 145 दिवसांपासून सुरु असलेल्या काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा (Bharat Jodo Yatra) समारोप आज झाला. यावेळी झालेल्या भाषणात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचा कोणताही नेता माझ्यासारखा चार दिवस पायी प्रवास करू शकत नाही. जम्मू-काश्मीरचे लोक त्यांना फिरू देणार नाहीत, असे नाही. भाजपचे लोक घाबरट आहेत, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.

‘भारत जोडो’ यात्रेचा 145 दिवसांच्या प्रवासानंतर आज या यात्रेचा समारोप झाला. या समारोपाच्या जनसभेला राहुल गांधी यांनी संबोधित केले. या जनसभेत बोलताना राहुल गांधी भावूक झाले होते. ते म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचा कोणताही नेता माझ्यासारखा चार दिवस पायी प्रवास करू शकत नाही. जम्मू-काश्मीरचे लोक त्यांना फिरू देणार नाहीत, असे नाही. तर, भाजपचे लोक घाबरट आहेत. जर तुम्हाला जगायचे असेल तर तुम्हाला न घाबरता जगायला हवे, हे मी महात्मा गांधीजींकडून शिकलो. मी चार दिवस इथे फिरलो.

जम्मू-काश्मीरच्या लोकांनी मला हँड ग्रेनेड दिले नाही

जम्मू-काश्मीरच्या लोकांनी मला हँड ग्रेनेड दिले नाही, तर खूप प्रेम दिले. अगदी कौतुकाने माझे स्वागत केले. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सुरू केलेला पायी प्रवास कठीण नसेल, असे मला वाटले. मात्र, कन्याकुमारी येथून सुरुवात केल्यावर लगेचच माझा गुडघा दुखायला लागला. मात्र, काश्मीरला येईपर्यंत ते दुःख दूर झाले, असे राहुल गांधी म्हणाले.

हिंसेची वेदना मी समजू शकतो

जे लोक हिंसा घडवून आणतात, त्यांना याचे दुःख कधीही समजणार नाही. मात्र, या हिंसेची वेदना मी समजू शकतो. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांचे काय झाले हे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना समजू शकत नाही. मी समजू शकतो. जेव्हा मी अमेरिकेत होतो, तेव्हा मला एक फोन आला आणि त्यांनी सांगितले की, माझ्या वडिलांची हत्या करण्यात आली आहे, अशी आठवण सांगत, असे फोन जवानांच्या घरी येणे बंद झाले पाहिजे, अशी माझी इच्छा आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

माझ्याकडे घर ही संरचना नाही

माझ्यासाठी घर ही संरचना नाही, तर ती जीवन जगण्याची पद्धत आहे. ज्याला तुम्ही काश्मिरियत म्हणता, मी ते घर मानतो. ही काश्मिरियत आहे का? अशी विचारणा राहुल गांधी यांनी केली. या पृथ्वीवर दोन विचारधारा आहेत, त्यांच्यात वर्षानुवर्षे नाते आहे. त्याला आपण काश्मिरियत म्हणतो, असे राहुल गांधी म्हणाले.

Web Title: Congress leader rahul gandhi criticizes prime minister narendra modi and bjp in bharat jodo yatra nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2023 | 03:25 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Bharat Jodo Yatra
  • BJP
  • Congress
  • jammu kashmir
  • narendra modi
  • political news
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया
1

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया

हे विधेयक पूर्णपणे क्रूर…; पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवू शकणाऱ्या विधेयकावरुन प्रियांका गांधी आक्रमक
2

हे विधेयक पूर्णपणे क्रूर…; पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवू शकणाऱ्या विधेयकावरुन प्रियांका गांधी आक्रमक

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित
3

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…
4

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.