
दोन मुलांसह वडिलाची आत्महत्या; चांदवड तालुक्यातील धक्कादायक घटना
लखनौ : राजधानीत एका न्यायाधीशाच्या मुलाने आत्महत्या (Suicide in UP) केली. एडीजी 5 विवेकानंदांचा मुलगा आयआयटी जेईई प्रवेश परीक्षेच्या निकालामुळे बराच काळ चिंतेत होता. निकाल पाहताच त्याने आत्महत्या केली. बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास न्यायाधीश, त्यांची पत्नी आणि त्यांचा एकुलता एक मुलगा अजितेश जेवण करून झोपायला गेले.
रात्री एक वाजण्याच्या सुमारास न्यायाधीशांच्या पत्नी आपल्या मुलाला पाहण्यासाठी त्यांच्या खोलीत पोहोचल्या तेव्हा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ प्रयत्न करूनही दरवाजा न उघडल्याने सर्वांनी तो तोडून आत जाऊन पाहिले असता अजितेशने आत्महत्या केल्याचे दिसले. याबाबत पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली.
आईने लपवला होता मोबाईल
अजितेश काही काळ आपल्या निकालाची काळजी करत होता. त्याने आयआयटी जेईईची प्रवेश परीक्षा दिली होती. मुलाची अडचण पाहून त्याच्या आईने चार दिवसांपूर्वी त्याचा मोबाइल घेऊन आपल्याकडे ठेवला होता, जेणेकरून तो निकाल पाहू नये आणि काही अनुचित प्रकार घडू नये. पण त्याने निकाल पाहिला आणि आत्महत्या केली.