
'३ कोटी द्या आणि मंत्री व्हा...', काँग्रेस महिला आमदाराला थेट फोन (Photo Credit- X)
मिळालेल्या माहितीनुसार, ६ जुलै रोजी केरळच्या एलाथुर मतदारसंघाच्या आमदार विद्या बालकृष्णन यांना एक अज्ञात व्हॉट्सॲप कॉल आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने इंग्रजीत संवाद साधत आपले नाव ‘राजकुमार’ असल्याचे सांगितले. आपण वायनाडच्या नवनिर्वाचित खासदार प्रियंका गांधी यांच्या दिल्लीतील अधिकृत कार्यालयातून बोलत असल्याचा दावा त्याने केला. आमदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी, त्या ठगाने सांगितले की त्याला हा मोबाईल नंबर त्याच जिल्ह्यातील एका ज्येष्ठ खासदाराने दिला आहे. तसेच आपण काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संबंधित असल्याचे भासवून त्याने आमदाराला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला.
Kerala: Elathur INC MLA Vidya Balakrishnan files complaint with Kozhikode cyber cell alleging fake call promising ministerial position. Caller demanded ₹3 crore. pic.twitter.com/iNewR6JLnC — News Arena India (@NewsArenaIndia) July 15, 2026
हा फोन कॉल सुरुवातीपासूनच अत्यंत संशयास्पद वाटल्याने आमदार विद्या बालकृष्णन यांना सायबर फसवणुकीचा संशय आला. त्यांनी घाबरून न जाता किंवा फोन कट न करता अत्यंत धैर्याने सुमारे १० मिनिटे त्या ठगाशी संभाषण सुरू ठेवले. संभाषणादरम्यान, आमदाराने हुशारीने “मी पैसे देण्यास तयार आहे, पण मला मंत्री कसे बनवले जाईल?” अशी विचारणा केली. यावर त्या ठगाने संपूर्ण प्रक्रियेची खोटी माहिती सविस्तर सांगण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्याचे नेमके इरादे काय आहेत हे स्पष्ट झाले.
Supreme Court : तिसरे अपत्य झाल्यास निवडणूक लढवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
फोन कॉल संपल्यानंतर आमदार बालकृष्णन यांनी तातडीने त्या खासदारांशी संपर्क साधला, ज्यांचे नाव ठगाने घेतले होते. त्यावर त्या खासदारांनी सांगितले की, “काही वेळापूर्वी मलाही ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (AICC) मुख्यालयातून बोलत असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीचा फोन आला होता आणि त्याने जिल्ह्यातील दोन आमदारांचे नंबर मागितले होते.” यानंतर आमदार आणि खासदारांनी थेट नवी दिल्लीतील प्रियंका गांधी यांच्या अधिकृत कार्यालयाशी संपर्क साधून विचारणा केली. तिथून स्पष्ट करण्यात आले की, त्यांच्या कार्यालयातून असा कोणताही कॉल करण्यात आलेला नाही आणि तो फोन पूर्णपणे बनावट होता.
सत्य समोर आल्यानंतर आमदार विद्या बालकृष्णन यांनी कोझिकोड सायबर सेलमध्ये रीतसर तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू केला असता, हा बनावट व्हॉट्सॲप कॉल दिल्लीमधून ऑपरेट केला गेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या आंतरराज्य सायबर टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी तपास तीव्र केला आहे. हा प्रकार केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला असून, कोणत्याही व्हीआयपी किंवा नेत्याच्या नावाने येणाऱ्या संशयास्पद आर्थिक मागण्यांच्या कॉल्सना बळी पडू नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
Sonam Wangchuk Hunger Strike: सोनम वांगचूक यांचे उपोषण जबरदस्तीने तोडले जाऊ शकते का, काय आहे नियम?