Nitin Gadkari Navabharat Interview: तामिळनाडू ते बंगालपर्यंत भाजपचा विजय निश्चित; नितीन गडकरींनी सांगितला ५ राज्यांतील विजयाचा मेगा प्लॅन
Nitin Gadkari Navabharat Interview: आसाम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले भाजपचे स्टार प्रचारक आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या विजयाचा मोठा विश्वास व्यक्त केला आहे. आसाममध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळेलच, पण तामिळनाडूपासून पश्चिम बंगालपर्यंत भाजपची कामगिरी ऐतिहासिक असेल, असा दावा त्यांनी एका विशेष मुलाखतीत केला.
“या निवडणुकीत फक्त ‘विकास’ हाच एकमेव मुद्दा आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील टीमने रस्ते, बंदरे, रेल्वे स्थानके आणि विमानतळांचे जे जाळे विणले आहे, ते जनतेला दिसत आहे. आसाममध्ये २ लाख कोटींहून अधिकच्या रस्ते प्रकल्पांमुळे आणि बांबूपासून इथेनॉल बनवण्याच्या उद्योगामुळे तरुणांचे जीवन बदलत आहे,” असंही गडकरी यांनी नमुद केलं.
Weather Alert: सावधान! पुढील काही तास धोक्याचे; गारपिटीचा इशारा, तुमच्या शहरात काय स्थिती?
देशात या वर्षात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पाच राज्यांच्या निवडणुकांबाबत गडकरींनी मोठ भाकित वर्तवलं आहे.आसाम निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय निश्चित आहेत. पुडुचेरीच्या निवडणुकीतही भाजपप्रणीत युतीचे सरकार पुन्हा येणार असल्याचा दावा त्यांनी केला. तर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये भाजप प्रस्थापित पक्षांना जोरदार टक्कर देत असून यंदाच्या निवडणुकीत या दोन्ही राज्यांमध्ये आम्हाला विजयाची खात्री आहे. तर केरळमध्येही भाजपच्या बाजूने सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला
घुसखोरीच्या मुद्द्यावर बोलताना गडकरी म्हणाले की, “अवैध विदेशी नागरिकांना बाहेर काढणे म्हणजे हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण नव्हे. विरोधक याला जाणीवपूर्वक धर्माशी जोडत आहेत. भारत हा सर्व अधिकृत नागरिकांचा (हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन) देश आहे आणि त्यांचे अधिकार समान आहेत.”
विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना गडकरींनी म्हणाले की, देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची कोणतीही कमतरता नाही. जागतिक युद्धाच्या परिस्थितीतही भारताने इंधनाचे दर स्थिर ठेवले आहेत, हे जगाने पाहिले आहे.
वाढत्या गॅस टंचाईवर गडकरींनी एक तांत्रिक उपाय सुचवला आहे. “कच्च्या कोळशापासून डीएमई (DME) गॅस काढून तो एलपीजीमध्ये ८ टक्क्यांपर्यंत मिसळता येऊ शकतो. यामुळे गॅसची आयात कमी होईल,” असे त्यांनी सांगितले. लवकरच ते या विषयावर पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी आणि नीती आयोगासोबत बैठक घेणार आहेत. पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाप्रमाणेच हा प्रयोग यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.






