केंद्र सरकार(Central Ministry)च्या संरक्षण विषयक कॅबिनेट कमिटी(Cabinate Committee)ने आज ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानुसार ‘अग्निपथ’ (Agnipath) नामक योजनेची घोषणा करण्यात आली असून याद्वारे तरुणांना भारतीय सैन्य दलांमध्ये (Indian Army) सामिल होण्याची संधी मिळणार[blurb content=””] आहे. संरक्षण मंत्री (Defence Minister) राजनाथ सिंह यांनी याबाबत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी तिन्ही दलांचे प्रमुखही उपस्थित होते.
Delhi | The Cabinet Committee on Security has taken a historic decision today to approve the transformative scheme of ‘Agnipath’. Under this, Indian youth would be granted an opportunity to get inducted into the Armed services: Defence Minister Rajnath Singh pic.twitter.com/eUv2SyQBPw
— ANI (@ANI) June 14, 2022
राजनाथ सिंह म्हणाले, अग्निपथ योजनेच्या लाभार्थी तरुणांना ‘अग्निवीर’ (Agniveer) हा किताब मिळणार आहे. या अग्नीवीरांना चांगल्या पगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर ४ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्तीवेतनही मिळणार आहे. या योजनेअंतर्गत सैन्य दलांचे स्वरुप अधिक तरुण करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. याद्वारे तरुणांना नव्या तंत्रज्ञानाने प्रशिक्षित करणे त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याची पातळी उंचावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या योजनेमुळे विविध क्षेत्रात नव्या स्कील्ससह रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.