Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपच्या मुंबईतील विजयाचा जल्लोष आसाममध्ये…! PM मोदींनी महापौर अन् बहुमतावरुन केले भाजपचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या आसाम दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सभेला संबोधित करताना महाराष्ट्रामध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीचा उल्लेख करत भाजपच्या लोकप्रियतेचा दाखला दिला.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 18, 2026 | 02:33 PM
Lakhpati Didi Scheme 2026: 3 कोटी महिलांना ‘लखपती’ बनवण्याचे लक्ष्य; महिलांच्या सक्षमीकरणाचा गेमचेंजर 'प्लॅन'

Lakhpati Didi Scheme 2026: 3 कोटी महिलांना ‘लखपती’ बनवण्याचे लक्ष्य; महिलांच्या सक्षमीकरणाचा गेमचेंजर 'प्लॅन'

Follow Us
Close
Follow Us:
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी काझीरंगा आसाम दौऱ्यावर
  • मोदी काझीरंगामधील भाषण चर्चेत
  • काझीरंगामध्ये केले महाराष्ट्राच्या निवडणुकीचे कौतुक
PM Modi in Assam: आसाम : महाराष्ट्रामध्ये नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आहेत. महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. यामुळे महाराष्ट्र भाजपमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. मुंबईमध्ये (BMC Election 2026) पहिल्यांदाच भाजपला बहुमत मिळाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान (PM Narendra Modi) यांनी देखील आपल्या एका भाषणामध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपने मिळवलेल्या या यशाचा उल्लेख केला आहे. यावेळी मुंबईतील भाजपचा विजय हा काझीरंगात देखील साजरा केला जात असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील कालियाबोर येथे एका जाहीर सभेत बोलताना काँग्रेसवर जोरदार टीका केली. मोदी म्हणाले, “आज भाजप देशभरातील लोकांची पहिली पसंती बनली आहे. गेल्या दीड वर्षात देशाचा भाजपवरील विश्वास सातत्याने वाढत आहे. बिहारमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या. २० वर्षांनंतरही तेथील लोकांनी भाजपला विक्रमी संख्येने मतदान केले. त्यांनी विक्रमी जागा जिंकल्या. दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये महापौर आणि नगरसेवकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. जगातील सर्वात मोठ्या महापालिकापैकी एक असलेल्या मुंबईतील लोकांनी भाजपला पहिल्यांदाच विक्रमी जनादेश दिला. मुंबईत विजय साजरा होत आहे आणि काझीरंगामध्ये जल्लोष साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातील बहुतेक शहरांमधील लोकांनी भाजपला सेवा करण्याची संधी दिली आहे.” असे मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले.

हे देखील वाचा : “आपल्याकडं ही गुंतवणूक का नाही? CM फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर रोहित पवारांचा सवाल

पुढे ते म्हणाले की, अलिकडच्या सर्व निवडणूक निकालांचा जनादेश स्पष्ट आहे. आज देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे आणि विकास आणि वारसा या दोन्हींवर लक्ष केंद्रित करायचे आहे. म्हणूनच ते भाजपला पसंती देतात. “या निवडणुकांमधून आणखी एक संदेश मिळतो. देश सातत्याने काँग्रेसच्या नकारात्मक राजकारणाला नाकारत आहे. मुंबई शहरात, जिथे काँग्रेसचा जन्म झाला, तो आज चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे.”असा टोला पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेस पक्षाला लगावला आहे.

हे देखील वाचा : दिल्ली-बागडोगरा विमानात बॉम्ब..! वॉशरुममध्ये सापडली चिठ्ठी अन् करावे लागले Emergency Landing

ईशान्येकडील विकासाबद्दल पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान म्हणाले की ईशान्येकडील सर्वात मोठे दुःख नेहमीच अंतर राहिले आहे. हृदये आणि ठिकाणांमधील अंतर. अनेक दशकांपासून, येथील लोकांना असे वाटत होते की देशाचा विकास इतरत्र होत आहे आणि त्यांना मागे सोडले जात आहे. याचा परिणाम केवळ अर्थव्यवस्थेवरच नाही तर विश्वासावरही झाला. ते म्हणाले, “भाजपने ही भावना बदलण्याचे काम केले. डबल इंजिन सरकारने ईशान्येकडील विकासाला प्राधान्य दिले. रस्ते, रेल्वे, हवाई मार्ग आणि जलमार्गांनी आसामला जोडण्याचे काम एकाच वेळी सुरू झाले, परंतु काँग्रेस पक्षाने कधीही त्याची पर्वा केली नाही. जेव्हा केंद्रात काँग्रेस सरकार सत्तेत होते तेव्हा आसामला रेल्वे बजेटचे तुटपुंजे बजेट मिळाले: सुमारे २००० कोटी रुपये. आता, भाजप सरकारने ते दरवर्षी अंदाजे १०,००० कोटी रुपये केले आहे.” असे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

Web Title: Pm narendra modi in kaziranga assam tour said mayor of bmc election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • Assam
  • BJP Politics
  • BMC Mayor
  • PM Modi

संबंधित बातम्या

Women Reservation Bill : मोदींना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही…; विधेयक नामंजूरीवरुन पेटलं राजकारण
1

Women Reservation Bill : मोदींना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही…; विधेयक नामंजूरीवरुन पेटलं राजकारण

थेट हल्ला! “विरोधकांचा जाणीवपूर्वक विधेयकाला खोडा?” सीमा सिंह यांचा विरोधकांवर निशाणा
2

थेट हल्ला! “विरोधकांचा जाणीवपूर्वक विधेयकाला खोडा?” सीमा सिंह यांचा विरोधकांवर निशाणा

Nanded News : श्रेयवादाचे राजकारण, भाजपात नाराजी; पक्ष संघटना कमकुवत अन् कार्यकर्ते निरुत्साही
3

Nanded News : श्रेयवादाचे राजकारण, भाजपात नाराजी; पक्ष संघटना कमकुवत अन् कार्यकर्ते निरुत्साही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.