
BJP General Secretary Vinod Tawde thanked party leaders after getting Rajya Sabha seat
Vinod Tawade Rajyasabha : मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. भाजपने राज्यातील चार जणांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. भाजपने (BJP Politics) सात राज्यसभेच्या जागांपैकी चार जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, (Vinod Tawde) सामाजिक कार्यकर्त्या मायाताई इवनाटे आणि रामराव वडकुते यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये सर्वात जास्त चर्चा ही विनोद तावडेंची आहे. त्यांनी भाजप पक्षासाठी केलेल्या कामाची ही पोचपावती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.
भाजपने राज्यसभेसाठी पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, ज्यामध्ये सहा राज्यांमधून नऊ नावे होती. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन बिहारमधून राज्यसभेवर येणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातून भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाचे कार्य आणि प्रचार करण्यासाठी विनोद तावडे यांनी मेहनत घेतली आहे. महाराष्ट्र, बिहार आणि इतर राज्यांमध्ये त्यांनी भाजपचा जोरदार प्रसार आणि प्रचार केला. यामधून त्यांची राजनीती आणि संघटनात्मक कार्यशक्ती दिसून आली. याच कौशल्यावर त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
हे देखील वाचा : अजित पवारांच्या अपघाताला नवे वळण! घटनेपूर्वी बारामती विमान तळाची रेकी? आमदार रोहित पवार यांचा धक्कादायक दावा
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी राज्यसभेची उमेदवारी जाहीर होताच सोशल मीडियावर पोस्ट करुन भावना व्यक्त केल्या आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे त्यांनी संधी दिल्याबद्दल धन्यवाद मानले आहेत. विनोद तावडे म्हणाले की, अनंत आभार आणि आभार! पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने राज्यसभेचा उमेदवार म्हणून निवड केल्याबद्दल वरिष्ठ नेतृत्वाचे मनापासून आभार! माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखाली, आम्ही नेहमीच देशहिताची सेवा करण्यास वचनबद्ध आहोत. या नामांकनाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मनापासून आभार! ही नवीन जबाबदारी पूर्ण समर्पण आणि निष्ठेने पार पाडण्यासाठी मी दृढ आणि वचनबद्ध आहे, असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला.
अनंत आभार एवं धन्यवाद! पार्टी की केंद्रीय चुनाव समिति द्वारा राज्यसभा हेतु उम्मीदवार घोषित किये जाने पर शीर्ष नेतृत्व का हार्दिक आभार! माननीय प्रधानमंत्री @narendramodi जी के मार्गदर्शन में और राष्ट्रीय अध्यक्ष @NitinNabin जी के नेतृत्व में हम प्रत्येक क्षण राष्ट्र हित के लिए… pic.twitter.com/KrKaff8eeK — Vinod Tawde (@TawdeVinod) March 4, 2026
हे देखील वाचा : राज्यसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील ‘या’ चौघांच्या नावावर शिक्कामोर्तब
नितीश कुमार यांनी एनडीएची साथ सोडल्यानंतर, भाजपने विनोद तावडे यांच्यावर विश्वासाने बिहारचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली. आणि त्यांनी पक्षाचा विश्वास खरा करुन दाखवला. बिहारसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यात त्यांनी बूथ स्तरापर्यंत भाजपची संघटना मजबूत केली. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करुन विजयाचा विश्वास जागवला. 2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या घवघवीत यशाचे ते मुख्य शिल्पकार मानले जातात. त्यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे भाजपला तिथे मोठे यश मिळाले.