
जरांगे अन् फडणवीस यांच्यातले भांडण नकली
मुंबई : देशपातळीवर इंडिया आघाडी आणि राज्यात महविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश केल्यास राहुल गांधी यांच्या यात्रेत सामील होऊ, असे पत्र वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला पाठवले आहे. काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’चा दुसरा टप्पा सध्या सुरू आहे. या भारत जोडो न्याय यात्रेत सामील व्हावे, असे आमंत्रण काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना दिले आहे. हे आमंत्रण प्रकाश आंबेडकर यांनी स्वीकारले असून, आंबेडकरांनी काँग्रेससमोर एक अट ठेवली आहे.
देशातील विरोधकांच्या इंडिया आघडीत आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत सहभागी करून घेतले, तरच भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी देशातील विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. देशभरातील विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत ‘वंचित’ सहभागी होणार का? असा प्रश्न आहे. मागच्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीतील नेत्यांचा संपर्क सुरू आहे. मात्र जागा वाटपाच्या मुद्यावर अद्याप एकमत झालेले नाही. त्यामुळे वंचित मविआमध्ये सामील होणार की नाही, याची स्पष्टता नाही.
खर्गेंशी संपर्क साधूनही समाविष्ट करून घेतलं नाही
प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही वंचित बहुजन आघाडीला अद्याप इंडिया आघाडी अथवा मविआमध्ये समाविष्ट करून घेतलेले नाही. यात विडंबन म्हणजे आपण पाठवलेल्या निमंत्रणात आपण इंडिया आघाडीचे महत्त्वाचे घटक आहात, असे म्हटले आहे.
सध्याच्या धर्मांध, जातीय, विभाजनकारी वातावरणात मोदींच्या सरकारविरोधात असणाऱ्यांनी सर्वसमावेशक भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे, जे की संघटित शक्ती व कार्यक्रम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजप आरएसएसच्या दुष्ट करावयांविरोधात लढ्याला टिकवून ठेवण्यासाठी गरजेचे आहे.
– ऍड. प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी.