Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

3 वर्षे जुन्या फोटोमुळे कायदा मंत्री रिजीजू वादात, 2019च्या तवांग दौऱ्याचे छायाचित्र केले ट्विट

केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी शनिवारी सैनिकांसोबतचे एक छायाचित्र ट्विट करत तवांग पूर्णतः सुरक्षित असल्याचा दावा केला होता. काँग्रेसने त्यांचे हे छायाचित्र 3 वर्ष जुने असल्याचा आरोप केला आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Dec 17, 2022 | 05:59 PM
3 वर्षे जुन्या फोटोमुळे कायदा मंत्री रिजीजू वादात, 2019च्या तवांग दौऱ्याचे छायाचित्र केले ट्विट
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री किरण रिजिजू सैनिकांसोबतच्या एका भेटीचे छायाचित्र शेयर करून वादात सापडलेत. काँग्रेसने त्यांचा हा फोटो 3 वर्ष जुना असल्याचा दावा केला आहे. युवक काँग्रेसचा बी व्ही श्रीनिवास यांनी रिजीजू यांचे दोन्ही फोटो एकत्र ट्विट करत रिजीजू यांना कात्रीत पकडले आहे. 2019 च्या फोटोचा वापर करून 2022 मध्ये सुरक्षेची ग्वाही दिली जात आहे. अद्भूत घोटाळा आहे, असे ते आपल्या ट्विटमध्ये म्हणालेत.

केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी शनिवारी सैनिकांसोबतचे एक छायाचित्र ट्विट करत तवांग पूर्णतः सुरक्षित असल्याचा दावा केला होता. काँग्रेसने त्यांचे हे छायाचित्र 3 वर्ष जुने असल्याचा आरोप केला आहे.

केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी शनिवारी सैनिकांसोबतच्या भेटीचे एक छायाचित्र ट्विट केले. त्यात त्यांनी तवांग पूर्णतः सुरक्षित असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, अरुणाचल प्रदेशच्या तवांगमधील यांगत्से क्षेत्र भारतीय लष्कराच्या बहाद्दर जवानांच्या मुबलक तैनातीमुळे आता पूर्णतः सुरक्षित आहे.

अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये 9 डिसेंबर रोजी भारत-चीनच्या सैनिकांत झालेल्या चकमकीवरून राजकीय चिखलफेक सुरू झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी या प्रकरणी चीनचे सीमेलगतचे बांधकाम भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा आरोप केला. ते एका ट्विटमध्ये म्हणाले – चीन डोकलामच्या जामफेरी रिजपर्यंत बांधकाम करत आहे. यामुळे सिलीगुडी कॉरिडोरला धोका उत्पन्न होत आहे. सिलीगुडी नॉर्थ ईस्टचे प्रवेशद्वार आहे. हे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी चिंताजनक आहे. त्यामुळे मोदीजी, चीनवर केव्हा चर्चा होणार?

दुसरीकडे, भाजप अध्यक्ष जे नड्डा यांनी राहुल यांचे विधान सैनिकांचे खच्चीकरण करणारे असल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधींचे विधान सैनिकांचे मनोधैर्य कमकूवत करणारे आहे. त्याचा निषेध करावा तेवढे कमी आहे. भारतीय सेना शौर्य व पराक्रमाचे प्रतीक आहे. देशावर संकट येते तेव्हा भारतीय सेना प्राणपणाने देशाची सुरक्षा करते.

Web Title: Rahul gandhi on pm narendra modi govt over india china border clash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2022 | 05:59 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • India china Border Clash
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

फलकावरून वाद, बुलढाण्यात राजकीय संघर्षाची ठिणगी; भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
1

फलकावरून वाद, बुलढाण्यात राजकीय संघर्षाची ठिणगी; भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

मी सरकारचा भाग नाही, मी आमदार अन्…; सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाने भाजपमध्ये खळबळ
2

मी सरकारचा भाग नाही, मी आमदार अन्…; सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाने भाजपमध्ये खळबळ

मुंबईत १० टक्के पाणी कपात असताना टँकरला पाणी मिळते कुठून? टँकर लॉबीला कोणाचा आशिर्वाद? अतुल लोंढेंचा सवाल
3

मुंबईत १० टक्के पाणी कपात असताना टँकरला पाणी मिळते कुठून? टँकर लॉबीला कोणाचा आशिर्वाद? अतुल लोंढेंचा सवाल

BJP Leader Murder : भाजप नेत्याची चाकूने हत्या, धारदार शस्त्राने वार करुन जागेवरच संपवलं; कारण…
4

BJP Leader Murder : भाजप नेत्याची चाकूने हत्या, धारदार शस्त्राने वार करुन जागेवरच संपवलं; कारण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.