
"हिंदू केवळ नाम नसून..."; 'मुंबई व्याख्यानमाले'तून कडाडले RSS सरसंघचालक मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष सुरू
सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले संबोधन
मुंबईतील व्याख्यानमालेचे आयोजन
मुंबई: गेलया वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) 100 वर्षे पूर्ण झाली आहेट. त्यानिमित देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले शताब्दी वर्ष साजरे करत आहे. अनेक उपक्रम राबवले जात आहेत. दरम्यान मुंबईच्या वरळी येथे नेहरू सेंटरमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचे नाव ‘मुंबई व्याख्यानमाला’ असे असून, आज यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी संबोधन केले.
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजकीय पक्ष नसून याच्याशी जोडलेले लोक राजकारणात आहेत.” मोहन भागवत यांनी संघाची परिभाषा, संघाचे कार्य, हिंदू शब्दाचे निर्माण याबाबत भाष्य केले आहे. भारतीय असणे म्हणजे केवळ नागरिक असणे नाही तर तो एक स्वभाव आहे. हा एक जोडणारा स्वभाव आहे, असे भागवत म्हणाले.
पुढे बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, “प्रत्येक व्यक्तीला दुसरींकडूनच काहीतरी माहिती होत असते. मात्र संघाशी तुलना करणारा दूसरा कोणी नाही. अनेकदा लोक संघाचे काम, कार्य चालू उपक्रम आणि विविध संस्था याला समजून घेतात. संघाला दुरून आणि वरवर पाहिले तरी गैरसमज होतात. कारण तुम्ही आमचे कार्यक्रम पाहता.”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष झाल्यामुळे नवा चित्रपट ‘शतक: संघाचे १०० वर्ष’
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरकारकडून कोणताही निधी न घेता, समाजाच्या मदतीने स्वतःचा निधी वापरुन, 1.3 लाख पेक्षा अधिक सेवा कार्य करत आहे. हिंदू केवळ नाम नसून ते विशेषण आहे. भारतात राहणार प्रत्येकजण हिंदू आहे. सर्व समाजाला एकत्रित करण्याशिवाय संघ दुसरे कोणतेही काम करत नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. अनेक जण म्हणतात ते आरएसएसचे पंतप्रधान आहेत. तर मी सांगतो की त्यांचा भाजप नावाचा एक राजकीय पक्ष आहे. ज्यामध्ये अनेक स्वयंसेवक आहेत”, असे मोहन भागवत म्हणाले.
संघाच्या स्थापनेला 100 वर्ष झाल्यामुळे नवा चित्रपट
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बहुप्रतिक्षित ‘शतक: संघाचे १०० वर्ष’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने देशभरात चर्चेची नवी लाट निर्माण केली आहे. संघाच्या शताब्दी वर्षाशी जोडलेला हा चित्रपट केवळ एका संघटनेचा प्रवास मांडत नाही, तर तिच्या वैचारिक भूमिकेचा, सामाजिक योगदानाचा आणि राष्ट्रजीवनातील सहभागाचा व्यापक आढावाही घेतो. टीझर प्रदर्शित होताच समर्थकांपासून टीकाकारांपर्यंत सर्वच स्तरांवर या चित्रपटावर चर्चा सुरू झाली आहे.