Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंदिरा गांधींनी आणि राजीव गांधींनी माझ्या वडिलांवर अन्याय केला; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केलं मनातलं दु:ख

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी त्यांच्या वडिलांशी संबंधित एक किस्सा शेअर केला. ते म्हणाले की माझे वडील नोकरशहा होते, ते सचिव झाले. पण आधी इंदिराजी आणि नंतर राजीव गांधी यांनी त्यांच्यावर अन्याय केला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 22, 2023 | 03:47 PM
Foreign Minister S Jaishankar

Foreign Minister S Jaishankar

Follow Us
Close
Follow Us:

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar ) यांनी मंगळवारी त्यांच्या वडिलांशी संबंधित एक आठवण शेअर केली. ते म्हणाले की माझे वडील प्रशासकीय अधिकारी होते, ते नंतर सचिव झाले. पण आधी इंदिरा गांधी (India Gandhi) आणि नंतर राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांनी त्यांच्यावर खूप अन्याय केला. ते एक उत्तम सचिव होते पण नतंर त्यांना पदावरुन हटवण्यात आलं. अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

[read_also content=”पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना भारत मदत करणार नाही; असं का म्हणाले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर? जाणून घ्या! https://www.navarashtra.com/world/what-jaishankar-said-about-india-help-pakistan-in-economic-crisis-n-rps-371461.html”]

 वडीलांबद्दल बोलले एस जयशंकर

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वडील डॉ. के. सुब्रमण्यम हे एक उत्तम रणनीतिक तज्ज्ञ मानले जातात. यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या कुटुंबाविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या. जयशंकर यांनी सांगितले की ते नोकरशहांच्या कुटुंबातून आले आहेत. जयशंकर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना एक उत्कृष्ट परराष्ट्र सेवेतील अधिकारी बनायचे होते आणि असा विचार करत असताना त्यांच्यासमोर त्यांच्या वडिलांची प्रतिमा तयार झाली. जयशंकर यांनी सांगितले की त्यांचे वडील डॉ. के सुब्रमण्यम हे उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी होते. १९७९ मध्ये जनता सरकारमध्ये त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली आणि ते बहुधा देशातील सर्वात तरुण प्रशासकीय अधिकारी बनले.  जयशंकर यांच्या वडिलांचे 2011 मध्ये निधन झाले होते आणि ते आपल्या मुलाला सचिव होताना पाहू शकले नाहीत. 

वडिलांवर झाला अन्याय

जयशंकर पुढे म्हणाले की, वडिलांसोबत खूप चुकीचं झालं. जयशंकर यांच्या मते, त्यांचे वडील आधी प्रशासकीय अधिकारी होते आणि नंतर ते सचिव झाले. 1980 मध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या आणि त्यांना पदावरून हटवले तेव्हा ते संरक्षण उत्पादन सचिव होते. जयशंकर म्हणतात, एवढेच नाही तर पुढे राजीव गांधी सरकारमध्येही वडिलांचा मार्ग अडवण्याचे प्रयत्न थांबले नाहीत. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला कॅबिनेट सचिव बनवण्यासाठी त्यांना हटवण्यात आले. जयशंकर यांनी सांगितले की, त्यानंतर त्यांचे वडील कधीच सचिव झाले नाहीत. त्याबद्दल त्याला खेद वाटला, पण ते कधीच त्याबद्दल बोलले नाही. जयशंकर यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांचा मोठा भाऊ पहिल्यांदा सचिव झाला तेव्हा वडिलांना खूप अभिमान वाटला.

अशी मिळाली मंत्रीपदाची संधी 

जयशंकर यांनी सांगितले की 2011 मध्ये जेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले, तेव्हा मी राजदूताप्रमाणे ग्रेड 1 अधिकारी बनू शकलो. मी सचिव झालो नाही. माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी सचिव झालो. तोपर्यंत बस सेक्रेटरी होण्याचे ध्येय होते, त्यामुळे मी ते ध्येय गाठले असल्याचे त्यांनी सांगितले. 2018 मध्ये मी टाटा सन्ससोबत होतो. तिथे सर्व काही व्यवस्थित चालले होते. मग ही राजकीय संधी चालून आली. एस जयशंकर यांनी सांगितले की मी यासाठी तयार नव्हतो त्यामुळे मी वेळ घेतला. जयशंकर यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी स्वतः त्यांना मंत्रिमंडळात सामील होण्यास सांगितले होते. २०११ मध्ये ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना चीनच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी यांची पहिल्यांदा भेट झाल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: S jaishankar said his father was a bureaucrat indira gandhi removed him and rajiv gandhi also suspended him nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2023 | 12:47 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Indira Gandhi
  • Rajiv Gandhi
  • S. Jaishankar

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
4

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.