
देशातील 19 राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळाचा इशारा; राजधानी दिल्लीत...
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. ओडिसा, झारखंड यांसारख्या राज्यांत पावसाने अक्षरश: कहर केला आहे. मुसळधार पाऊस त्यानंतर आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आता देशातील 19 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 90 किमीपर्यंत पोहोचू शकतो.
राजधानी दिल्लीतही पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. डोंगराळ राज्यांमध्ये भूस्खलनाचा आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये वीज पडण्याचा धोका आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये मान्सून सक्रिय राहील. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळ यांसह १९ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.
महाबळेश्वरमध्ये पावसाचा धुमाकूळ; वेण्णा तलाव ओव्हरफ्लो, आंबेनळी घाटात दरडी तर पर्यटकांची तुफान गर्दी
दरम्यान, काही भागांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी ९० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. डोंगराळ राज्यांमध्ये भूस्खलनाचा धोका असून, पूर्वेकडील राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटाबाबतही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
रस्ते वाहतुकीवर होणार परिणाम
दिल्लीसाठी मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, वारे ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहू शकतात. कमाल तापमान सुमारे ३६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पावसादरम्यान रस्त्यांवर पाणी साचण्याची आणि वाहतुकीत व्यत्यय येण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशातील अनेक भागांत मुसळधार पाऊस
उत्तर प्रदेशमध्ये, मेरठ, गौतम बुद्ध नगर, अलीगढ, आग्रा, मथुरा, कानपूर, बहराइच, बलरामपूर, आंबेडकर नगर, वाराणसी, चंदौली, सोनभद्र, मिर्झापूर, शाहजहानपूर, रामपूर, उन्नाव, प्रयागराज, देवरिया आणि गोरखपूरसाठी मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.