Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

100 वर्षे दीर्घायुषी होण्याचा सद्गुरूंचा मूलमंत्र, 90% लोक चुकीच्या पद्धतीने खातात अन्न; बदलेल आयुष्य

अन्न हे फक्त पोट भरण्यासाठी नसते तर ते शरीराला पोषण आणि ऊर्जा प्रदान करण्याचे एक साधन असते. पण, ९०% लोकांना अन्न खाण्याची योग्य पद्धत माहित नाही? असे आता समोर आले आहे, जाणून घ्या योग्य पद्धत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 17, 2025 | 04:44 PM
जग्गी वासुदेव यांनी दिली दीर्घायुषी होण्याची गुरुकिल्ली

जग्गी वासुदेव यांनी दिली दीर्घायुषी होण्याची गुरुकिल्ली

Follow Us
Close
Follow Us:

अन्न हे फक्त पोट भरण्यासाठी नसते तर ते शरीराला पोषण आणि ऊर्जा प्रदान करण्याचे एक साधन असते. पण, तुम्हाला माहिती आहे का की ९०% लोकांना अन्न खाण्याची योग्य पद्धत माहीत नाही? ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी अलीकडेच म्हटले आहे की चुकीच्या खाण्याच्या सवयी केवळ आपल्या आरोग्याला हानी पोहोचवत नाहीत तर आपले आयुष्य देखील कमी करू शकतात.

सद्गुरूंनी खाण्यापिण्याचे काही खास नियम सांगितले आहेत, ज्यांचे पालन करून तुम्ही केवळ निरोगी राहू शकत नाही तर तुमचे आयुष्य देखील वाढवू शकता. त्यांचा असा विश्वास आहे की बहुतेक लोकांना ते काय खात आहेत आणि कसे खात आहेत याची जाणीव नसते. त्यांनी असे पाच मंत्र दिले आहेत जे तुमचे आरोग्य आणि जीवनशैली पूर्णपणे बदलू शकतात. जीवनाचा हा मूलमंत्र तुम्हाला १०० वर्षाचे दीर्घायुष्य जगण्यासाठी नक्कीच कामी येऊ शकतो. जाणून घ्या सद्गुरू जग्गी वासुदेव यांचा गुरूमंत्र (फोटो सौजन्य – iStock/Instagram) 

अन्न व्यवस्थित चावणे 

जेवताना अन्न चाऊन खावे घाईघाईथ खाऊ नये

सद्गुरु म्हणतात की जेवताना अन्न व्यवस्थित चावणे खूप महत्वाचे आहे. अन्न न चावता गिळल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि पोषण योग्यरित्या शोषले जात नाही. आपल्याला अगदी शाळेपासून अन्नाचा घास ३२ वेळा चाऊन खावा असे शिकवले जाते. मात्र सध्या इतकी घाई असते की पदार्थ नीट न चावता भराभर खाल्ला जातो आणि तो पचण्यास त्रास होतो. त्यामुळे तुम्ही जेवताना आपल्या जेवणाकडे लक्ष देत अन्न नीट चाऊन खाल्ले जात आहे की नाही याची खात्री करून घ्यावी 

जेवण्याची योग्य वेळ 

सद्गुरू म्हणाले की दिवसातून दोनदा खाणे पुरेसे आहे. जास्त वेळा खाल्ल्याने शरीराला अतिरिक्त काम करावे लागते, ज्यामुळे थकवा जाणवतो. म्हणून, दिवसातून दोनदा पौष्टिक आणि संतुलित जेवण खा. तसंच आपल्या जेवणाची वा आपण जे अन्न खात आहोत त्याच्या दोन्ही वेळा तुम्ही व्यवस्थित ठरवून घ्या आणि त्याच वेळेदरम्यान खा 

बदाम खाण्यापूर्वी करा एक काम, कॅन्सरचा धोका होईल कमी, सद्गुरू जग्गी वासुदेवांचा सल्ला

जेवण आणि झोपण्यातील अंतर 

जेवण आणि झोपण्यातील अंतर किती असावे

सद्गुरूंनी झोपण्यापूर्वी किमान ३-४ तास आधी जेवावे यावर भर दिला. रात्री उशिरा जेवल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि शरीराची ऊर्जा वाया जाते. तसंच अन्न योग्य पद्धतीने पचत नाही आणि त्यामुळे परिणाम शरीरावर होतो आणि तुमचे वजन वाढते. याशिवाय कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि अन्य आजारांनाही निमंत्रण मिळते 

अन्न कसे खावे

सद्गुरूंचा असा विश्वास आहे की अन्न आदराने आणि जाणीवपूर्वक खाल्ले पाहिजे. जेवताना टीव्ही पाहणे किंवा फोनवर वेळ घालवणे यामुळे लक्ष विचलित होते आणि शरीर अन्नातून योग्य पोषण शोषू शकत नाही. त्यामुळे जेवताना आपल्या पदार्थांकडे लक्ष द्यावे. आपल्याला किती भूक लागली आहे आणि त्यानुसार अन्नाचा समावेश आपल्या ताटात करून घ्यावा. जेणेकरून शरीराला अन्नाचे पोषण योग्य प्रकारे मिळते 

2 गोष्टींत ठेवलेले अन्न खाणे टाळा, Sadhguru Jaggi Vasudev यांनी उघडले डोळे; 90 टक्के लोकांना कॅन्सरचा धोका

प्रोसेस्ड फूड टाळा

प्रोसेस्ड फूडचा आपल्या आहारात समावेश करणं टाळा

नैसर्गिक आणि ताजे अन्न खाणे चांगले हे सगळेच सांगतात आणि सद्गुरूंनीदेखील हेच सांगितले आहे. प्रक्रिया केलेले आणि पॅकेज केलेले अन्न टाळणे चांगले कारण त्यात रसायने आणि प्रिझर्व्रेटिव्ह्ज असतात जे आरोग्यासाठी हानिकारक असतात. त्यामुळे हे अन्न खाणे टाळावे. तसंच हे अन्न पॅकबंद करण्याची तारीख आणि आपण खाण्याची तारीख यामध्ये फरक पडतो, ज्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात 

दीर्घायुष्यासाठी सद्गुरुंचा फॉर्म्युला

सद्गुरूंच्या मते, या सोप्या नियमांचे पालन करून तुम्ही तुमचे शरीर निरोगी आणि सक्रिय ठेवू शकता. योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ल्याने तुमचे वय तर वाढल्यानंतरही तुम्हाला त्रास होणार नाही आणि शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत मिळेल. याशिवाय तुमचे जीवन ऊर्जा आणि ताजेपणाने भरून जाईल.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: 100 sadhguru jaggi vasudev life changing tips will make you live 100 years 90 percent people eat food wrong way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 04:44 PM

Topics:  

  • Health Tips
  • Sadhguru Jaggi Vasudev

संबंधित बातम्या

Baba Ramdev ने सांगितला रक्त वाढविण्याचा देशी जुगाड, बुलेट स्पीडने 7 दिवसात 7 पासून 14 पर्यंत जाईल Hemoglobin
1

Baba Ramdev ने सांगितला रक्त वाढविण्याचा देशी जुगाड, बुलेट स्पीडने 7 दिवसात 7 पासून 14 पर्यंत जाईल Hemoglobin

दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या ‘या’ पदार्थांचे नियमित करा सेवन, वाढत्या वयात सुद्धा दिसाल सुंदर
2

दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या ‘या’ पदार्थांचे नियमित करा सेवन, वाढत्या वयात सुद्धा दिसाल सुंदर

Constipation Home Remedies: बद्धकोष्ठतेमुळे शौच होतेय कडक, ‘या’ भुशाचा करा वापर, पोटातील चिकटलेली घाण त्वरीत येईल बाहेर
3

Constipation Home Remedies: बद्धकोष्ठतेमुळे शौच होतेय कडक, ‘या’ भुशाचा करा वापर, पोटातील चिकटलेली घाण त्वरीत येईल बाहेर

नो जिम, नो डाएट, अशाप्रकारे फिटनेस कोचने घटवलं 40 किलो वजन; वजन नियंत्रणात ठेवायचंय तर ही ट्रिक फॉलो करा
4

नो जिम, नो डाएट, अशाप्रकारे फिटनेस कोचने घटवलं 40 किलो वजन; वजन नियंत्रणात ठेवायचंय तर ही ट्रिक फॉलो करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.