Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात संसर्गजन्य आजारांच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ! अवकाळी-पूर-दुष्काळासोबत डेंग्यू-मलेरियाचा धोका

वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे या दिवसांमध्ये शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. राज्यात डेंग्यू, मलेरियाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 07, 2026 | 10:10 AM
राज्यात संसर्गजन्य आजारांच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ! अवकाळी-पूर-दुष्काळासोबत डेंग्यू-मलेरियाचा धोका

राज्यात संसर्गजन्य आजारांच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ! अवकाळी-पूर-दुष्काळासोबत डेंग्यू-मलेरियाचा धोका

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रात हवामान बदल आता केवळ पर्यावरणाचा मुद्दा राहिलेला नसून तो थेट सार्वजनिक आरोग्याचा गंभीर धोका बनला आहे. राज्याच्या स्टेट अॅक्शन प्लॅनमधील आकडेवारीनुसार, पूर, दुष्काळ आणि अतिवृष्टी यांसारख्या टोकाच्या हवामान घटनांमुळे आरोग्य यंत्रणेवर अभूतपूर्व ताण निर्माण होत असून, संसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्‌याने वाढत आहे. टोकाचे हवामान, वाढते जलजन्य आजार यामुळे राज्य आरोग्य व्यवस्थेवर दुहेरी संकट स्थिती असते. राज्याच्या अहवालानुसार, महाराष्ट्राची भौगोलिक रचना आणि हवामानातील असमानता हीच आता मोठी जोखीम ठरत आहे. या टोकाच्या हवामानाचा सर्वाधिक फटका आरोग्य क्षेत्राला बसत आहे.(फोटो सौजन्य – AI)

Diabetes रुग्णाचा आहार कसा असावा? काय खावे आणि काय खाऊ नये? लगेच नोंद करून घ्या…

डेंग्यू आणि मलेरियासारख्या डासजन्य आजारांनी राज्यात अक्षरशः डोके वर काढले आहे. डेंग्यूची रुग्णसंख्या २०१७ मधील ७,८२९ वरून २०२१ मध्ये १२,७२० पर्यंत झेपावली, तर मलेरियाचे रुग्ण २०१८ मधील १०,७५७ वरून १९,३०३ पर्यंत वाढले ही वाढ केवळ आकडे नाहीत, तर नियंत्रण सुटत चालल्याचे संकेत आहेत. अचानक पडणारा पाऊस तर कधी ऊन इत्यादी बदलत्या वातावरणामुळे आरोग्यासंबंधित असंख्य समस्या वाढू लागतात. सतत बदलणारे वातावरणात आरोग्यावर लगेच परिणाम करते. यामुळे डेंग्यू, मलेरिया इत्यादी आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.

डासांचे प्रमाण वाढले

तज्ज्ञ स्पष्टपणे सांगतात की पाऊस, आर्द्रता आणि तापमानातील वाढ हीच या आजारांची पोषक जमीन आहे, वाढते तापमान आणि अनियमित पावसामुळे डासांचे प्रमाण वाढत असून, डेंग्यूचे रुग्ण आता पारंपरिक हंगामाबाहेरही आढळू लागले आहेत. मान्सून उशिरा माधारी फिरणे हा देखील एक गंभीर घटक ठरत आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे पाणीजन्य आजारांचा धोका पुन्हा वाढला आहे. सुरक्षित पाण्याच्या सुविधा वाढूनही जोरदार पावसाच्या तडाख्यात अनेक भागात पिण्याचे पाणी दूषित होत असल्याने संसर्ग वाढत आहे.

सकाळी उठल्यानंतर तोंड कडू झाल्यासारखे वाटते? अ‍ॅसिडिटी की लिव्हरसंबंधित आजार? कडवटपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय

हवामान बदलाचा वेग आणि त्याचे परिणाम पाहता, केवळ उपाययोजना जाहीर करून भागणार नाही, आरोग्य यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन आणि हवामान धौरण यांचा एकत्रित आणि कठोर अंमल झाला नाही, तर महाराष्ट्राला भविष्यात अधिक भीषण आरोग्य संकटाला सामोरे जावे लागेल, हे निश्वित आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: राज्यात संसर्गजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ का होत आहे?

    Ans: हवामानातील बदल, अवकाळी पाऊस, पूरस्थिती, दुष्काळ आणि अस्वच्छता यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे.

  • Que: डेंग्यू आणि मलेरिया कशामुळे पसरतात?

    Ans: हे दोन्ही आजार डासांद्वारे पसरतात. साचलेले पाणी, अस्वच्छ परिसर आणि पावसाळ्यातील परिस्थिती यामुळे डासांची संख्या वाढते.

  • Que: या आजारांची प्रमुख लक्षणे कोणती आहेत?

    Ans: ताप, अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या, अशक्तपणा, प्लेटलेट्स कमी होणे (डेंग्यूमध्ये) अशी लक्षणे दिसू शकतात.

Web Title: A big increase in the number of patients of infectious diseases in the state risk of dengue malaria with unseasonal flood drought

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • infections
  • Mumabi

संबंधित बातम्या

गारगाई प्रकल्पात २६८.८० कोटी रुपयांची झाली बचत! कंत्राटदाराने दरात केली ७ टक्क्यांनी कपात
1

गारगाई प्रकल्पात २६८.८० कोटी रुपयांची झाली बचत! कंत्राटदाराने दरात केली ७ टक्क्यांनी कपात

कॅन्सर रुग्णांना मोठा धक्का! PMJAY पॅनेलमधून ३०० डॉक्टरांना वगळले, भविष्यात निर्माण होऊ शकते तत्ज्ञांची कमतरता
2

कॅन्सर रुग्णांना मोठा धक्का! PMJAY पॅनेलमधून ३०० डॉक्टरांना वगळले, भविष्यात निर्माण होऊ शकते तत्ज्ञांची कमतरता

उन्हाळ्यात ‘या’ लोकांनी आवर्जून करावे फणसाच्या गऱ्यांचे सेवन, जाणून घ्या शरीराला होणारे भरमसाट फायदे
3

उन्हाळ्यात ‘या’ लोकांनी आवर्जून करावे फणसाच्या गऱ्यांचे सेवन, जाणून घ्या शरीराला होणारे भरमसाट फायदे

संशयास्पद हालचालींवर मुंबई महानगरपालिका ठेवणार बारीक लक्ष! शहरात बसवले जाणार आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा
4

संशयास्पद हालचालींवर मुंबई महानगरपालिका ठेवणार बारीक लक्ष! शहरात बसवले जाणार आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.