
आलिया भट्टचा सद्गुरूंना मोलाचा प्रश्न (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सामान्य महिला आणि अभिनेत्री यांचे पालकत्व वेगळे असते का असा प्रश्न सर्वांना पडतो. पण मुलं ही सगळीच सारखी असतात आणि काही सवयी सोडल्यास अगदी अभिनेत्रींनाही काही गोष्टीत पालकत्व चुकत नाही. त्यांनाही सामान्य महिलांना आई झाल्यानंतर येणारे प्रश्न सतावत असतात आणि हेच आलियाच्या प्रश्नांमधूनही समजून आले.
आलियाला पडला कोणता प्रश्न?
खरं तर, चेन्नईमधील एका कार्यक्रमात सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्याशी नुकत्याच झालेल्या संभाषणादरम्यान, आलिया भट्टने पालकत्वाशी संबंधित एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. आपण चांगले पालक आहोत की नाही या चिंतेने सतत ग्रासलेल्या पालकांनी काय करावे, हे तिला जाणून घ्यायचे होते. तिचा प्रश्न साधा होता, पण तो आजच्या जवळपास प्रत्येक पालकाच्या विचारांचे प्रतिबिंब आहे.
सद्गुरूंचे साधे पण समर्पक उत्तर
सद्गुरूंनी आलिया भट्टच्या प्रश्नाला एक साधे पण गहन उत्तर दिले. ते म्हणाले की, जे पालक सतत चिंतेत असतात, ते चांगले पालक बनू शकत नाहीत. त्यांच्या मते, मुलांचे संगोपन करताना, अती चिंता करण्यापेक्षा संतुलन आणि शांतता राखणे अधिक महत्त्वाचे आहे. स्थिर आणि सकारात्मक पालकत्वाच्या वातावरणाचा मुलाच्या सभोवतालच्या वातावरणावर थेट परिणाम होतो.
आई झाल्यापासून आलिया भट्टने अनेकदा आपले मातृत्वाचे अनुभव सांगितले आहेत. तिच्या मते, मातृत्व ही एक सुंदर भावना असली तरी, त्यासोबत जबाबदाऱ्या आणि गहन भावनाही येतात. नोकरी करणाऱ्या आईसाठी करिअर आणि कुटुंबात संतुलन साधणे हे एक मोठे आव्हान असते आणि हा प्रश्नही या संभाषणात उपस्थित झाला.
आलियाने मांडले मनात असलेले संभ्रम
आलिया भट्ट आणि सद्गुरू यांच्यातील हा संवाद विशेष ठरला, कारण एका सेलिब्रिटी आईने आपल्या चिंता आणि संभ्रम उघडपणे मांडले. प्रत्येक पालकाला अनेकदा प्रश्न पडतो की आपण योग्य गोष्ट करत आहोत की नाही, आणि सद्गुरूंचा संदेश सामान्य पालकांनाही लागू पडतो. केवळ सामान्यच नाही तर सेलिब्रिटी आईंनादेखील या संभ्रमांमधून जावं लागतं.
तज्ज्ञ यावरही सहमत आहेत की मुलांना परिपूर्ण वातावरणाची गरज नसते, तर भावनिकदृष्ट्या सशक्त आणि संतुलित वातावरणाची गरज असते. मुलांच्या विकासासाठी शांत आणि आनंदी पालक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
तरूण झाल्यावर आई-वडिलांपासून का दूर जातात मुलं? Sadhguru जग्गी वासुदेवांनी सांगितले सर्वात मोठे कारण
पहा व्हिडिओ