
मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांच्या शरीरात वाढतो 'या' कॅन्सरचा धोका, वेळीच सावध होऊन ओळखा लक्षणे
कोणत्या वयात मासिक पाळी बंद होते?
मेनोपॉज म्हणजे काय?
मेनोपॉजनंतर कोणत्या कॅन्सरचा धोका वाढतो?
प्रत्येक महिलेला महिन्यातील चार ते पाच दिवस मासिक पाळी येते. मासिक येणे ही शरीरातील नैसर्गिक क्रिया आहे. या दिवसांमध्ये महिलांना खूप जास्त शारीरिक आणि मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये काहीवेळा खूप जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे थकवा, अशक्तपणा वाढतो आणि शरीरसंबंधित गंभीर लक्षणे दिसू लागतात. बऱ्याचदा मासिक पाळी येण्याच्या आधी आणि आल्यानंतर खूप जास्त समस्या उद्भवतात. या समस्यांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. पण वारंवार दुर्लक्ष करणे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. कालांतराने मासिक पाळी वयाच्या ४५ ते ५५ दरम्यान बंद होते. याला मेनोपॉज असे म्हणतात. मेनोपॉज हा प्रत्येक महिलेच्या शरीरात होणारी नैसर्गिक क्रिया आहे. पण मेनोपॉज आल्यानंतर महिलांमध्ये खूप जास्त गंभीर समस्या दिसू लागतात. हॉट फ्लॅशेज, रात्री झोप येणे, मूड स्विंग, थकवा व्हजायनल ड्रायनेस आणि फोकस करण्यास समस्या इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवतात.(फोटो सौजन्य – istock)
अचानक मासिक पाळी बंद झाल्यानंतर शरीरात हार्मोन्सचे असंतुलन झाल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय मेनोपॉजनंतर महिलांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण सुद्धा होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मेनोपॉज नंतरच्या काळात महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण का वाढते आणि कोणत्या कॅन्सरची लागण होते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. वयाच्या ४० व्या वर्षानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. पण या बदलांकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. असे केल्यामुळे छोटे आजार गंभीर स्वरूप घेतात आणि शरीराचे पूर्णपणे नुकसान करतात. त्यामुळे कॅन्सरसंबंधित आजारांची जनजागृती करण्यासाठी संपूर्ण देशभरात सगळीकडे कॅन्सर डे साजरा केला जातो.
मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांना कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. मेनोपॉजनंतरच्या दिवसांमध्ये शरीरातील अॅस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सचे प्रमाण खूपच कमी होऊन जाते. या बदलांमुळे ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर आणि ओव्हरी कॅन्सरचा धोका वाढतो. याशिवाय वय वाढल्यानंतर सुद्धा कॅन्सरचा धोका असतो. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या कोणत्याही सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. यामुळे आजाराचे निदान होऊन जीव वाचेल.
Menopause म्हणजे काय? मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या काळजी, राहाल कायमच आनंदी
महिलांमध्ये सामान्यपणे दिसून येणारा आजार म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. कॅन्सरची हिस्ट्री, लठ्ठपणा, मद्यसेवन आणि कमी फिजिकल अॅक्टिविटी इत्यादी अनेक गोष्टींमुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता असते. लठ्ठपणा, मधुमेह आणि हार्मोन्सचे असंतुलन झाल्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. याशिवाय जीवनशैलीत होणाऱ्या छोट्या मोठ्या चुकांमुळे आतड्यांच्या कॅन्सरचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. आतड्यांचा कॅन्सर हा जीवघेणा कॅन्सर म्हणून ओळखला जातो.
Ans: मासिक पाळीमध्ये खूप जास्त रक्तस्राव, दोन पाळ्यांच्या दरम्यान रक्तस्राव होणे.
Ans: मासिक पाळीचा कालावधी खूप लांबला असेल, रक्तस्राव सामान्यपेक्षा जास्त असेल
Ans: जर गाठ वेगाने वाढत असेल, कठीण असेल, आणि त्यासोबतच वजन कमी होणे, ताप येणे किंवा तीव्र वेदना होत असतील, तर ती गाठ कर्करोगाची असण्याची शक्यता असते.