
झोपल्यानंतर पायांमध्ये सतत गोळे येतात? संधिवात व हाडांचा त्रास वाढवण्यास कारणीभूत ठरतात जीवनशैलीतील 'या' चुका
पायांमध्ये सतत गोळे का येतात?
शरीरात कोणत्या विटामिनची कमतरता निर्माण झाल्यास पाय दुखतात?
मॅग्नेशियम वाढवण्यासाठी काय खावे?
धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. याचा थेट परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा रात्रीच्या वेळी झोपल्यानंतर पायांमध्ये गोळे किंवा पेटके येऊन पायांमध्ये खूप जास्त वेदना होतात. शरीरात निर्माण झालेली मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियमची कमतरता, शरीरातील पाण्याची कमतरता, स्नायूंचा थकवा किंवा मज्जासंस्थेचे आजार झाल्यानंतर शरीरात विविध लक्षणे दिसू लागतात. तासनतास एका जागेवर बसून काम करणे, शारीरिक हालचालींचा अभाव, दिवसभरात सतत काम करत राहिल्यामुळे शरीराच्या स्नायूंना आराम मिळत नाही. स्नायूंवर वाढलेल्या अतिरिक्त तणावामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. हाडांमध्ये वेदना वाढल्यानंतर बऱ्याचदा मेडिकलमधील गोळ्या औषध आणून खाल्ली जातात. पण याच गोळ्यांच्या सेवनामुळे शरीरावर दुष्परिणाम होण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
चुकीच्या गोळ्यांचे सेवन, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि वाढत्या कोलेस्टरॉलमुळे हाडे आणि स्नायूंमध्ये वेदना वाढू लागतात. ज्यावेळी पायांचे स्नायू अनैच्छिकरित्या आकुंचन पावतात आणि शिथिल होत नाहीत तेव्हा पायांमध्ये खूप जास्त गोळे येतात आणि वेदना वाढतात. ही समस्या प्रामुख्याने पायांच्या काफ मसल्समध्ये जाणवू लागते. वय वाढल्यानंतर स्नायूंमध्ये खूप जास्त वेदना वाढण्याची शक्यता असते. नसांमधील सिग्नलमध्ये होणारे बदल आणि शरीरात वारंवार होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे रात्रीच्या वेळी झोपल्यानंतर पायांमध्ये गोळे येतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
उन्हाळ्यासह इतर कोणत्याही ऋतूंमध्ये शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. आवश्यक घटक आणि इलेक्ट्रोलाईट्स, खनिजांची कमतरता निर्माण झाल्यानंतर स्नायूंवर परिणाम होतो. त्यामुळे स्नायूंना आराम देण्यासाठी मॅग्नेशियमची फार आवश्यकता असते. स्नायूंच्या आकुंचनासाठी कॅल्शियम आवश्यक आहे. पण रक्तात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता हाडांमधील वेदना वाढवते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर हाड आणि स्नायूंमध्ये वेदना वाढतात. त्यामुळे नियमित भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे रक्तभिसरणात अडथळे निर्माण होतात.
शरीरसंबंधित अतिशय गंभीर आजार म्हणजे मधुमेह. हा आजार झाल्यानंतर आयुष्यभर गोळ्या औषधांचे सेवन करावे.मधुमेह हा कधीच बरा न होणारा आजार आहे. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर पायांना स्नायूंना इजा पोहचण्याची जास्त शक्यता असते. पायांच्या नसांना इजा झाल्यामुळे झोपल्यानंतर पायात खूप जास्त गोळे येतात. याशिवाय रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची औषधांमुळे सुद्धा पायांमध्ये वेदना होण्याची जास्त शक्यता असते.
स्नायूंमध्ये वाढलेला तणाव आणि थकवा कमी करण्यासाठी गोळा आल्यावर पाय सरळ करून समोरच्या दिशेने ओढावा. यामुळे पायाचे स्नायू ताणले जातात. तसेच वारंवार पायांमध्ये वेदना होत असतील तर गरम पाण्यात मीठ टाकून पाय शेकवावे. यामुळे रक्तभिसण सुधारण्यास मदत होते. तसेच रक्तभिसरण सुरळीत चालू ठेवण्यासाठी झोपताना पायाखाली उशी ठेवावी. दिवसभरात ३ लिटर पाणी आणि संतुलित आहार घेतल्यास स्नायूंमध्ये वाढलेल्या वेदना कमी होण्यास मदत होईल.
Ans: झोपेत पायात गोळे येण्याची मुख्य कारणे म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता, कॅल्शियम/मॅग्नेशियमची कमतरता, किंवा चुकीची जीवनशैली.
Ans: होय, काही वेळा संधिवात किंवा सांध्यांच्या समस्यांमुळे पायात वेदना आणि गोळे येऊ शकतात.
Ans: पुरेसे पाणी प्या, नियमित व्यायाम करा, स्ट्रेचिंग करा आणि संतुलित आहार घ्या.