
सकाळच्या नाश्त्यात चुकीचे पदार्थ खात असाल तर थांबा! सकाळी चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, उद्भवतील गंभीर समस्या
सकाळच्या नाश्त्यात कोणते पदार्थ खाऊ नये?
अपचनाचा त्रास कशामुळे वाढतो?
नाश्त्यात कोणते पदार्थ खाऊ नये?
सकाळच्या नाश्त्यात सगळ्यांचं सतत काहींना काही खाण्याची सवय असते. उठल्यानंतर एक कपभर चहा आणि नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इतर वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. पण काहीवेळा नाश्त्यात खाल्लेल्या पदार्थांमुळे अपचनाचा त्रास वाढण्याची शक्यता असते. रिकाम्या पोटी चुकीचे पदार्थ खाल्ल्यामुळे आम्लपित्त, जळजळ, गॅस किंवा पोटात अस्वस्थता वाढून काहीच करण्याची अजिबात इच्छा होत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर भूक लागली म्हणून कोणतेही पदार्थ खाण्याऐवजी शरीरास आवश्यक असलेले पदार्थ खावेत. अन्यथा वारंवार अपचनाचा त्रास उद्भवून पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे अपचनाचा त्रास वाढला आहे? उपाशी पोटी ‘या’ पद्धतीने करा आल्याचे सेवन
उठल्यानंतर अनेकांना उपाशी पोटी चहा किंवा कॉफी पिण्याची खूप जास्त सवय असते. पण उपाशी पोटामध्ये कॅफिन गेल्यामुळे आम्लता वाढते, ज्याच्या परिणामामुळे घशाजवळ जळजळ होणे, आंबट ढेकर तर काहीवेळा उलट्या, मळमळ होऊन आरोग्य बिघडून जाते. लिंबू, संत्री, मोसंबी यांसारखी आंबट फळे किंवा फळांचा रस उपाशी पोटी कधीच घेऊ नये. यामुळे दातांवर पिवळेपणा वाढण्यासोबतच पोटात जळजळ आणि आंबटपणा जाणवण्याची खूप जास्त शक्यता असते. दिवसभरात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे सहज पचन होणाऱ्या आणि सात्विक अन्नपदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे.
फळे खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. पण चुकीच्या पद्धतीने फळांचे सेवन करणे अजिबात गुणकारी नाही. रिकाम्या पोटी फळांचे सेवन करण्याऐवजी इतर पदार्थांसोबत फळे खावी. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी अनेकांना टोमॅटोचा रस पिण्याची सवय असते. पण पित्ताच्या त्रासाने त्रस्त असलेल्या लोकांसाठी टोमॅटोचा रस घातक ठरू शकतो. याशिवाय संवेदनशील पोट असलेल्या व्यक्तींना जळजळ किंवा आम्लपित्ताची लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे रिकाम्या पोटी टोमॅटोच्या रसाचे अजिबात सेवन करू नये. तिखट पदार्थ, लोणची, चटण्या किंवा जास्त मसालेदार पदार्थ कधीच रिकाम्या पोटी खाऊ नये.
अन्नपदार्थांचे सेवन न करता तिखट किंवा तेलकट चटण्या खाल्ल्यास जळजळ, पोटदुखी किंवा आम्लपित्ताचा त्रास वाढू शकतो. दुपारच्या वेळी रात्रीचे शिळे अन्नपदार्थ खाऊ नये. यामुळे जळजळ वाढते आणि उलट्या, मळमळ होते. सकाळच्या नाश्त्यात चुकूनही गोड पदार्थांचे सेवन करू नये. गोड पदार्थांच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते आणि शरीराला हानी पोहचते. वारंवार जळजळ, गॅस, पोटदुखी किंवा आंबट ढेकर येत असतील तर डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन उपचार करावे आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करणे आवश्यक आहे.
Ans: अतितेलकट आणि तळलेले पदार्थ, जास्त साखर असलेले पदार्थ, पॅकेज्ड किंवा अतिप्रक्रिया केलेले पदार्थ आणि पोषणमूल्य कमी असलेले पदार्थ नियमितपणे नाश्त्यात घेणे टाळावे.
Ans: तळलेले आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ काही लोकांना अपचन, आम्लपित्त किंवा पोट फुगण्यासारख्या तक्रारी देऊ शकतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात त्यांचे प्रमाण मर्यादित ठेवणे चांगले.
Ans: प्रत्येक व्यक्तीची आहाराची गरज वेगळी असते. मात्र दिवसभरातील पोषणाची गरज पूर्ण होईल असा संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. नाश्ता केल्यास प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतील असे पदार्थ निवडावेत.