Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यात चुकीचे पदार्थ खात असाल तर थांबा! सकाळी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, उद्भवतील गंभीर समस्या

सकाळच्या नाश्त्यात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे नाश्त्यात हेल्दी आणि शरीरास सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया नाश्त्यात कोणते पदार्थ खाऊ नये.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 12, 2026 | 09:58 AM
सकाळच्या नाश्त्यात चुकीचे पदार्थ खात असाल तर थांबा! सकाळी चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, उद्भवतील गंभीर समस्या

सकाळच्या नाश्त्यात चुकीचे पदार्थ खात असाल तर थांबा! सकाळी चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, उद्भवतील गंभीर समस्या

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात कोणते पदार्थ खाऊ नये?
अपचनाचा त्रास कशामुळे वाढतो?
नाश्त्यात कोणते पदार्थ खाऊ नये?

सकाळच्या नाश्त्यात सगळ्यांचं सतत काहींना काही खाण्याची सवय असते. उठल्यानंतर एक कपभर चहा आणि नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इतर वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. पण काहीवेळा नाश्त्यात खाल्लेल्या पदार्थांमुळे अपचनाचा त्रास वाढण्याची शक्यता असते. रिकाम्या पोटी चुकीचे पदार्थ खाल्ल्यामुळे आम्लपित्त, जळजळ, गॅस किंवा पोटात अस्वस्थता वाढून काहीच करण्याची अजिबात इच्छा होत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर भूक लागली म्हणून कोणतेही पदार्थ खाण्याऐवजी शरीरास आवश्यक असलेले पदार्थ खावेत. अन्यथा वारंवार अपचनाचा त्रास उद्भवून पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे अपचनाचा त्रास वाढला आहे? उपाशी पोटी ‘या’ पद्धतीने करा आल्याचे सेवन

उठल्यानंतर अनेकांना उपाशी पोटी चहा किंवा कॉफी पिण्याची खूप जास्त सवय असते. पण उपाशी पोटामध्ये कॅफिन गेल्यामुळे आम्लता वाढते, ज्याच्या परिणामामुळे घशाजवळ जळजळ होणे, आंबट ढेकर तर काहीवेळा उलट्या, मळमळ होऊन आरोग्य बिघडून जाते. लिंबू, संत्री, मोसंबी यांसारखी आंबट फळे किंवा फळांचा रस उपाशी पोटी कधीच घेऊ नये. यामुळे दातांवर पिवळेपणा वाढण्यासोबतच पोटात जळजळ आणि आंबटपणा जाणवण्याची खूप जास्त शक्यता असते. दिवसभरात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे सहज पचन होणाऱ्या आणि सात्विक अन्नपदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे.

फळे खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. पण चुकीच्या पद्धतीने फळांचे सेवन करणे अजिबात गुणकारी नाही. रिकाम्या पोटी फळांचे सेवन करण्याऐवजी इतर पदार्थांसोबत फळे खावी. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी अनेकांना टोमॅटोचा रस पिण्याची सवय असते. पण पित्ताच्या त्रासाने त्रस्त असलेल्या लोकांसाठी टोमॅटोचा रस घातक ठरू शकतो. याशिवाय संवेदनशील पोट असलेल्या व्यक्तींना जळजळ किंवा आम्लपित्ताची लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे रिकाम्या पोटी टोमॅटोच्या रसाचे अजिबात सेवन करू नये. तिखट पदार्थ, लोणची, चटण्या किंवा जास्त मसालेदार पदार्थ कधीच रिकाम्या पोटी खाऊ नये.

टॉक्सिक वर्कप्लेसमुळे त्रस्त आहात? ऑफिसमधील नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवून पाॅझिटीव्ह राहण्यासाठी खास टिप्स

अन्नपदार्थांचे सेवन न करता तिखट किंवा तेलकट चटण्या खाल्ल्यास जळजळ, पोटदुखी किंवा आम्लपित्ताचा त्रास वाढू शकतो. दुपारच्या वेळी रात्रीचे शिळे अन्नपदार्थ खाऊ नये. यामुळे जळजळ वाढते आणि उलट्या, मळमळ होते. सकाळच्या नाश्त्यात चुकूनही गोड पदार्थांचे सेवन करू नये. गोड पदार्थांच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते आणि शरीराला हानी पोहचते. वारंवार जळजळ, गॅस, पोटदुखी किंवा आंबट ढेकर येत असतील तर डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन उपचार करावे आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सकाळच्या नाश्त्यात कोणते पदार्थ टाळावेत?

    Ans: अतितेलकट आणि तळलेले पदार्थ, जास्त साखर असलेले पदार्थ, पॅकेज्ड किंवा अतिप्रक्रिया केलेले पदार्थ आणि पोषणमूल्य कमी असलेले पदार्थ नियमितपणे नाश्त्यात घेणे टाळावे.

  • Que: सकाळी रिकाम्या पोटी तळलेले पदार्थ खाणे योग्य आहे का?

    Ans: तळलेले आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ काही लोकांना अपचन, आम्लपित्त किंवा पोट फुगण्यासारख्या तक्रारी देऊ शकतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात त्यांचे प्रमाण मर्यादित ठेवणे चांगले.

  • Que: नाश्ता टाळल्याने शरीरावर परिणाम होतो का?

    Ans: प्रत्येक व्यक्तीची आहाराची गरज वेगळी असते. मात्र दिवसभरातील पोषणाची गरज पूर्ण होईल असा संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. नाश्ता केल्यास प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतील असे पदार्थ निवडावेत.

Web Title: Stop if you are eating the wrong foods for breakfast avoid eating these items in the morning at all costs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 09:58 AM

Topics:  

  • acidity
  • breakfast tips
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम
1

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम

शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! कावीळ झाल्यास लाल रक्तपेशी तुटण्यासोबतच उद्भवतील गंभीर समस्या
2

शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! कावीळ झाल्यास लाल रक्तपेशी तुटण्यासोबतच उद्भवतील गंभीर समस्या

कच्चा कांदा खाणे शरीरासाठी चांगले की वाईट? कांद्यामुळे पोटात इन्फेक्शन वाढते का? जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याची योग्य पद्धत
3

कच्चा कांदा खाणे शरीरासाठी चांगले की वाईट? कांद्यामुळे पोटात इन्फेक्शन वाढते का? जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याची योग्य पद्धत

पावसाळ्यात खालेल्या ‘या’ भाज्यांमुळे वर्षभर राहाल तंदुरुस्त आणि फिट, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच आजार होतील गायब
4

पावसाळ्यात खालेल्या ‘या’ भाज्यांमुळे वर्षभर राहाल तंदुरुस्त आणि फिट, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच आजार होतील गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.