उपाशी पोटी चहा पिण्याआधी करा 'या' पदार्थांचे सेवन, ॲसिडिटी- अपचनाचा त्रास होईल गायब
चहा कॉफी पिण्याची योग्य पद्धत?
उपाशी पोटी चहा पिण्याचे तोटे?
चहा कॉफी पिण्याआधी कोणती काळजी घ्यावी?
जगभरात असांख्य चहाप्रेमी लोक आहेत. सकाळी झोपेतून उठल्यानंतर सगळ्यात आधी काहींना चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. चहा कॉफी प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवात अजिबात चांगली होत नाही. याशिवाय बेड टी अनेकांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग झाला आहे. झोपेची सुस्ती घालवण्यासाठी चहा प्यायला जातो. पण ७ ते ८ तासांच्या शांत झोपेनंतर उपाशी पोटी चहा कॉफीचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते. ही सवय शरीरासाठी सायलेंट किलर ठरू शकते. त्यामुळे सकाळच्या वेळी उपाशी पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन करत असाल तर सवयींमध्ये बदल करणे फार आवश्यक आहे. अन्यथा वारंवार अपचनाच्या समस्या उद्भवून आरोग्य बिघडू शकते.(फोटो सौजन्य – istock)
रिकाम्या पोटी चहा कॉफीचे सेवन केल्यास छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर, पोट फुगणे आणि गॅस-ॲसिडिटीचा त्रास सुरु होऊन आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे उपाशी पोटी अजिबात चहा किंवा कॉफीचे सेवन करू नये. यासाठी तुम्हाला चहा सोडण्याची गरज नाही. पण योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात चहा कॉफीचे सेवन करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला उपाशी पोटी चहा किंवा कॉफी पिण्याची योग्य पद्धत कोणती, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.
डॉक्टरांच्या मते, रात्रभर ७ ते ८ तासांच्या शांत झोपेनंतर शरीर उपाशी होऊन जाते. यासोबतच शरीरातील पाण्याचे प्रमाण सुद्धा कमी झालेले असते. त्यामुळे उठल्यानंतर थेट चहा प्यायल्यास पोटातील ॲसिडची पातळी झपाट्याने वाढते. यामुळे वारंवार ॲसिडिटी, गॅस, पोटात तीव्र जळजळ आणि अपचनाच्या समस्या उद्भवतात. तर काहीवेळा रिकाम्या पोटी चहा कॉफीचे सेवन केल्यास शरीरातील ऊर्जा कमी होऊन जातो आणि शरीरात प्रचंड थकवा, अशक्तपणा वाढण्याची खूप जास्त शक्यता असते. शरीरात वाढलेली सुस्ती कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागते.
रिकाम्या पोटी चहा कॉफीचे सेवन केल्यामुळे ॲसिडिटी, गॅस, पोटात तीव्र जळजळ आणि अपचनाच्या समस्या वाढून आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे पोटाचे रक्षण आणि पचनसंस्था सुधारण्यासाठी चहा पिण्याच्या आधी एक ग्लास साधे किंवा कोमट पाणी प्यावे. तसेच नाश्ता केल्यानंतर चहा किंवा कॉफी प्यावी. भिजवलेले बदाम, खजूर, केळे किंवा हलका नाश्ता केल्यानंतर चहा प्यायल्यास कोणतीही समस्या उद्भवणार नाही. वारंवार फॉलो केलेल्या चुकीच्या सवयी शरीराला गंभीर धोका निर्माण करतात.






