२००५: आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे सीरीयाने लेबाननमधुन सैन्य काढुन घेतले.
१९९५: आशियाई विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या निशा मोहोताने इंटरनॅशनल वुमन मास्टर किताब मिळवला.
१९८९: बांगलादेशात चक्रीवादळामुळे सुमारे १,३०० लोक ठार, १२,००० जखमी आणि ८०,००० बेघर झाले.
१९८६: रशियातील चेर्नोबिल येथील अणुभट्टीत भीषण स्फोट होऊन किरणोत्सारी पदार्थ वातावरणात फेकले गेले.
१९७३: अजित नाथ रे भारताचे १४ वे सरन्यायाधीश झाले.
१९७०: जागतिक बौद्धिक मालमत्ता संघटना स्थापन करणारया अधिवेशनाची अंमलबजावणी झाली.
१९६४: टांगानिका झांजीबार मिळून टांझानिया देश तयार झाला.
१९६२: रेंजर-४ हे नासाचे यान चंद्रावर कोसळले.
१९३३: नाझी जर्मनीच्या गेस्टापो या गुप्त पोलिसदलाची स्थापना झाली.
१९०३: अटलेटिको माद्रिद असोसिएशन फुटबॉल क्लबची स्थापना झाली.
१९४८: मौशमी चटर्जी – अभिनेत्री
१९४२: इफ्तिकार हुसैन अन्सारी – भारतीय राजकारणी, मौलवी (निधन: ३० सप्टेंबर २०१४)
१९०८: सर्वमित्र सिकरी – १३वे सरन्यायाधीश (निधन: २४ सप्टेंबर १९९२)
१९००: चार्ल्स रिच्टर – अमेरिकन भूवैज्ञानिक (निधन: ३० सप्टेंबर १९८५)
१९९९: मनमोहन अधिकारी – लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते (जन्म: २० जून १९२०)
१९८७: शंकरसिंग रघुवंशी – शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार (जन्म: ५ ऑक्टोबर १९२२)
१९७६: आरतीप्रभू – कवी, कादंबरीकार आणि नाटककार (जन्म: ८ मार्च १९३०)
१९२०: श्रीनिवास रामानुजन – भारतीय गणिती (जन्म: २२ डिसेंबर १८८७)