आतड्यांमध्ये चिकटलेली घाण होईल क्षणार्धात स्वच्छ! रात्री झोपण्याआधी करा 'या' सोनेरी पाण्याचे सेवन
रोजच्या आहारात खाल्लेल्या सर्वच पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर होतो. जंक फूड, तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. यामुळे ऍसिडिटी, गॅस किंवा शरीरात विषारी घटक साचून राहण्याची शक्यता असते. शरीरात दिसून येणाऱ्या बदलांकडे लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आतड्यांमध्ये चिकटून राहिलेल्या विषारी घटकांमुळे पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही, ज्यामुळे चेहऱ्यावर सतत पिंपल्स येणे, मुरूम किंवा डाग वाढू लागतात. तसेच चेहरा खूप जास्त तेलकट आणि चिकट होऊन जातो. चेहऱ्यावर जमा झालेल्या घाणीमुळे त्वचा अधिकच निस्तेज आणि काळवंडलेली वाटू लागते. चेहऱ्यावरील ग्लो कमी झाल्यानंतर बाजारातील स्किन केअरचा वापर केला जातो.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात साचून राहिलेल्या घाणीचा आणि विषारी वायूचा परिणाम थेट चेहऱ्यावर होतो, ज्यामुळे पिंपल्स, मुरूम किंवा काळे डाग वाढू लागतात. त्यामुळे आहारात बदल करून सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. याशिवाय शरीर स्वच्छ करण्यासाठी नियमित डिटॉक्स पेयांचे सेवन करावे. यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेला विषारी वायू आणि विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो मिळवण्यासाठी रात्री झोपण्याआधी कोणत्या पाण्याचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पाण्याचे महिनाभर नियमित सेवन केल्यास सकारात्मक फरक दिसून येईल.
डिटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात जिरं, ओवा आणि बडीशेप घालून १० मिनिटं पाणी व्यवस्थित उकळवून घ्या. यामुळे पदार्थांमधील अर्क पाण्यात उतरेल. त्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेल्या पाण्याचे सेवन करा. डिटॉक्स पेयांचे नियमित सेवन केल्यास चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स, मुरूम आणि काळे डाग कमी होऊन चेहऱ्यावर चमकदार ग्लो येईल. याशिवाय शरीरात साचून राहिलेली विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी हेल्दी पेयांचे सेवन करावे. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी बडीशेप, जिऱ्याचे पाणी प्यावे.
जेवणानंतर सगळ्यांचं बडीशेप खाण्याची सवय असते. यामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होतात. बडीशेप त्वचेसाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. त्वचा नैसर्गिकरित्या ताजीतवानी ठेवण्यासाठी बडीशेप किंवा बडीशेपचे पाणी प्यावे.
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना जिऱ्याचा वापर केला जातो. जिऱ्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे जेवणाला फोडणी देताना जिऱ्याचा भरपूर वापर केला जातो. जिऱ्याचे सेवन केल्यामुळे रक्त शुद्ध होते आणि शरीरातील घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते. चेहऱ्यावर चमक वाढवण्यासाठी नियमित जिरं, बडीशेप आणि ओव्याचे पाण्याचे न चुकता सेवन करावे.
त्वचेची काळजी घेण्यासाठी मुख्य टिप्स:
दिवसातून २-३ वेळा चेहरा धुवा, कारण यामुळे त्वचेवरील घाण आणि तेल निघून जाते. उन्हाळ्यात त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करणे महत्त्वाचे आहे.
सामान्य त्वचा रोग आणि त्यांची लक्षणे?
जेव्हा त्वचेची छिद्रे तेल, बॅक्टेरिया आणि मृत त्वचेमुळे ब्लॉक होतात तेव्हा मुरुम येतात.एक्झिमा झाल्यानंतर त्वचा कोरडी होते आणि खाज सुटते, त्यामुळे सूज, क्रॅक किंवा खवले येऊ शकतात.