Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळाघोडा फेस्टिव्हलमध्ये ई-कचरा रिसायकलिंग! पर्यावरण, आरोग्य व अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरणार जनजागृती

मुंबई महानगरपालिकेने नेमलेल्या मे. इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग कंपनी ही मोहीम राबवत आहे. ई-कचऱ्यात शिसे, पारा, कॅडमियम यांसारखी घातक रसायने असतात. ती माती, पाणी आणि हवेत मिसळल्यास गंभीर प्रदूषण होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 07, 2026 | 01:42 PM
काळाघोडा फेस्टिव्हलमध्ये ई-कचरा रिसायकलिंग! पर्यावरण, आरोग्य व अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरणार जनजागृती

काळाघोडा फेस्टिव्हलमध्ये ई-कचरा रिसायकलिंग! पर्यावरण, आरोग्य व अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरणार जनजागृती

Follow Us
Close
Follow Us:

प्रत्येक वर्षी मुंबईमध्ये काळाघोडा फेस्टिवलचे आयोजन केले जाते. या फेस्टिवलमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी कायमच पाहायला मिळतात. मोबाईल, संगणक, बॅटरी यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारा ई-कचरा हा पर्यावरणासाठी मोठा धोका ठरत असताना, कालाघोडा कला महोत्सवात मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारलेल्या ई-वेस्ट रिसायकलिंग स्टॉलने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या स्टॉलच्या माध्यमातून ई-कचरा रिसायकलिंग किती आवश्यक आहे आणि ते पर्यावरण, आरोग्य व अर्थव्यवस्थेसाठी कसे फायदेशीर आहे, याबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेने नेमलेल्या मे. इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग कंपनी ही मोहीम राबवत आहे. ई-कचऱ्यात शिसे, पारा, कॅडमियम यांसारखी घातक रसायने असतात. ती माती, पाणी आणि हवेत मिसळल्यास गंभीर प्रदूषण होते.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

ताजमहाल पाहण्यासाठी सर्वोत्तम महिना कोणता? पर्यटकांची असते मोठी गर्दी; प्रवासापूर्वी नक्की वाचा

ई-कचऱ्याचे शास्त्रीय व्यवस्थापन करणे बंधनकारक:

योग्य पद्धतीने रिसायकलिंग केल्यास हे प्रदूषण टाळता येते, तसेच मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणामही कमी करता येतात, अशी माहिती स्टॉलवर देण्यात आली आहे. मोवाईल, संगणक आणि बॅटरीमधून ताबे सोने, चांदी, लिथियम यासारखे मौल्यवान धातू पुन्हा मिळवता येतात, त्यामुळे नवीन खनिज उत्खननाची गरज कमी होते. यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण, ऊर्जा बचव आणि जंगलतोडीवरही आळा बसतो.

तसेच ई-वेस्ट रिसायकलिंगमुळे हरित उद्योगांना चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतात. भारत सरकारच्या इवेस्ट मॅनेजमेंट नियमानुसार ई-कचऱ्याचे शास्त्रीय व्यवस्थापन करणे बंधनकारक असल्याची माहितीही या स्टॉलद्वारे नागरिकांना देण्यात आली.

Drying Clothes Indoors: तुम्हीही बेडरूममध्ये ओले कपडे वाळवता का? मग वेळीच सावध व्हा, होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

उद्याच्या पिढीसाठी स्वच्छ शाश्वत पर्यावरण:

या उपक्रमाबाबत माहिती देताना इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग कंपनीच्या मार्केटिंग मॅनेजर वैशाली पेठे आणि भाग्यश्री लोखंडे यांनी सांगितले की, “आज नागरिकांनी ई-कचऱ्याचे योग्य रिसायकलिंग केले, तरच उद्याच्या पिढीसाठी स्वच्छ आणि शाश्वत पर्यावरण निर्माण होऊ पर्यावरण शकते. “कलेसोबतच संरक्षणाचा संदेश देणारा हा स्टॉल कालाघोडा महोत्सवातील एक महत्त्वाचा आणि समाजप्रबोधनात्मक उपक्रम ठरत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: E waste recycling at kalaghoda festival public awareness will be beneficial for environment health and economy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • art festival
  • environment
  • Garbage Issue

संबंधित बातम्या

“हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष….”; CM Devendra Fadnavis यांचे स्पष्ट निर्देश
1

“हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष….”; CM Devendra Fadnavis यांचे स्पष्ट निर्देश

भौमितिक आकारांतून आयुष्य मांडणारे ‘काळाघोडा’चे प्रवेशद्वार! प्लास्टिकचा पुनर्वापर करत पर्यावरणीय संदेश
2

भौमितिक आकारांतून आयुष्य मांडणारे ‘काळाघोडा’चे प्रवेशद्वार! प्लास्टिकचा पुनर्वापर करत पर्यावरणीय संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.