
Summer Skin Care: वाढत्या उन्हाळ्यात सुद्धा त्वचेला मिळेल भरपूर पोषण! १० मिनिटांमध्ये घरीच तयार करा Detox water
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते. तसेच या दिवसांमध्ये शरीर लगेच थकून जाते. सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, ज्याच्या परिणामुळे थकवा, अशक्तपणा वाढून काहीवेळा रक्तदाब सुद्धा कमी होतो. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे त्वचा सुद्धा सुकल्यासारखी वाटते आणि चेहऱ्यावरील ग्लो निघून जातो. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर संपूर्ण शरीरावर परिणाम दिसून येतो. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. वाढत्या उष्णतेमुळे पचनक्रिया बिघडते आणि शरीरात अनेक बदल दिसू लागतात. ऍसिडिटी, बद्धकोष्ठता, पोटात वाढलेली उष्णता इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येतात.(फोटो सौजन्य – istock)
सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची खूप जास्त काळजी घेतली जाते. कधी फेसमास्क लावला जातो तर कधी महागड्या स्किन ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतली जाते. पण सतत केल्या जाणाऱ्या ट्रीटमेंटमुळे त्वचेची पोत खराब होते. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि उन्हाळ्यात सुद्धा त्वचा फ्रेश आणि चमकदार ठेवण्यासाठी घरच्या घरी डिटॉक्स वॉटर तयार करावे. डिटॉक्स पेय प्यायल्यामुळे शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते आणि तुम्ही कायमच फ्रेश राहता.
गुलाब पाणी, सब्जा, लिंबू, पुदिना, काकडी आणि बीट इत्यादी पदार्थांचा वापर करून डिटॉक्स वॉटर बनवले जाते. यासाठी एक लिटर पाण्यात सब्जा बिया, गुलाबाच्या पाकळ्या, लिंबाचा रस, पुदिन्याच्या पानांचे तुकडे, बीटचे तुकडे घालून पाणी चमच्याने मिक्स करा आणि झाकण लावून रात्रभर तसेच ठेवा. सकाळी उठल्यानंतर पाण्याचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. डिटॉक्स वॉटर प्यायल्यामुळे शरीराला आणि त्वचेला खूप जास्त फायदे होतात. तसेच गुलाबाच्या पाकळ्यांऐवजी तुम्ही गुलाब पाण्याचा सुद्धा वापर करू शकता. गुलाबाच्या पाण्यामुळे शरीरात थंडावा टिकून राहतो आणि त्वचा खूप जास्त फ्रेश दिसते. पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी नियमित डिटॉक्स पेयाचे सेवन करावे.
शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आणि आतड्यांमधील विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी लिंबाचा रस अतिशय फायदेशीर ठरतो. तसेच पुदिन्याच्या पानांमध्ये असलेला नैसर्गिक थंडावा उष्णता कमी करून त्वचा फ्रेश आणि हायड्रेट ठेवतो. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर काकड्या उपलब्ध होतात. काकडीचे सेवन केल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते. काकडीमध्ये ९२ टक्के पाणी असते. त्यामुळे नियमित काकडी आणि थंड पदार्थांचे सेवन करावे. आठवड्यातून एकदा बीट खाल्ल्यास शरीर स्वच्छ होण्यास मदत होते. यासोबतच रक्तातील घाण स्वच्छ झाल्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.