
वारंवार होणारा सर्दी खोकला शरीरासाठी ठरेल घातक! Tuberculosis झाल्यानंतर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
क्षयरोग होण्याची कारणे?
क्षयरोगाची गंभीर लक्षणे?
सर्दी खोकल्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो?
वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत सर्दी खोकला होणे, वारंवार येणारा ताप काहींना अतिशय सामान्य वाटतो. पण ही सामान्य लक्षणे नसून शरीरसंबंधित गंभीर आजरांचे संकेत आहेत. सर्दी खोकला झाल्यानंतर काहीवेळा शरीराची रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे कमकुवत होऊन जाते. सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर तो बराच काळ टिकून राहणे शरीरासाठी धोक्याचे आहे. अचानक कमी होणे वजन, बदललेली भूक, खाण्यापिण्याची इच्छा न होणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यानंतर जास्त वेळ न घालवता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. ही लक्षणे क्षयरोगाची असू शकतात. भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये क्षयरोगाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढत आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला क्षयरोग कशामुळे होतो? क्षयरोगाची लागण झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसतात? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
उच्च रक्तदाब असेल तर वेळीच व्हा सावध! दैनंदिन जीवनातील ‘या’ चुकीच्या सवयी शरीरासाठी ठरतात अतिशय घातक
क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे. या आजाराची लागण झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. पौष्टिक घटकांचा अभाव निर्माण झाल्यानंतर प्रामुख्याने हा आजार होतो. याशिवाय मधुमेह किंवा एचआयव्ही ग्रस्त रुग्णांना हा आजार होण्याची जास्त शक्यता असते. फुफ्फुसीय क्षयरोगाची लागण झाल्यानंतर खोकला आणि ताप येतो. तसेच संसर्गजन्य विषाणूची शरीरात वाढ होण्यास सुरुवात झाल्यानंतर वजन अचानक कमी होऊन जाते. फुफ्फुसांव्यतिरिक्त इतर अवयवांमध्ये टीबी होण्याची शक्यता जास्त असते. हाडे, पोट, लिम्फ नोड्स, मेंदू इत्यादी अवयवांना टीबीची लागण होते.
दोन-तीन आठवडे सततचा खोकला.
कधीकधी कफात रक्त येणे.
रात्री वाढणारा ताप.
रात्री घाम येणे
सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे.
श्वास घेण्यास त्रास होणे
छातीत दुखणे
Gastric Headache: गॅस डोक्यापर्यंत पोहचतो का? जाणून घ्या किती घातक ठरू शकतो हा आजार
क्षयरोगाची लागण झालेल्या व्यक्तीपासून काही अंतर लांब राहावे. कारण हा संसर्गजन्य आजार आहे. बॅक्टेरियाचा प्रसार रोखण्यासाठी खोकला किंवा शिंकताना रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा. यामुळे इतरांनी आजाराची लागण होणार नाही. गर्दीच्या ठिकाणी बाहेर जाताना मास्क लावून फिरावे. कारण धूळ, माती आणि प्रदूषणामुळे आजार वाढण्याची शक्यता असते. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप, पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास टीबीसारखा गंभीर आजार सुद्धा सहज बरा होतो.
Ans: टीबी हवेतून पसरतो. बाधित व्यक्ती खोकल्यास, शिंकल्यास किंवा बोलल्यास हे जिवाणू हवेत पसरतात आणि श्वासाद्वारे दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करू शकतात.
Ans: ३ आठवड्यांपेक्षा जास्त काळाचा खोकला, संध्याकाळी ताप येणे आणि रात्री घाम येणे
Ans: होय, टीबी हा पूर्णपणे बरा होणारा रोग आहे. सरकारद्वारे नि-क्षय प्रणाली द्वारे मोफत औषधे आणि निदान उपलब्ध करून दिले जाते.