उच्च रक्तदाब असेल तर वेळीच व्हा सावध! दैनंदिन जीवनातील 'या' चुकीच्या सवयी शरीरासाठी ठरतात अतिशय घातक
उच्च रक्तदाब वाढण्याची कारणे?
उच्च रक्तदाबाची गंभीर लक्षणे?
जीवनशैलीत कोणते बदल करावेत?
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, पोषक घटकांची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव, मानसिक ताण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीराला गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडते. त्यातील हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी घातक ठरणारा आजार म्हणजे उच्च रक्तदाब. उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर आजार असे सुद्धा म्हंटले जाते. शरीरात दिसून येणारी लक्षणे ही गंभीर आजारांशी मिळती जुळती असतात, पण लक्षणे योग्य वेळी ओळखता येत नाहीत. उच्च रक्तदाबाला हायपरटेंशन असे सुद्धा म्हंटले जाते. उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी नियमित रक्तदाब तपासणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
Gastric Headache: गॅस डोक्यापर्यंत पोहचतो का? जाणून घ्या किती घातक ठरू शकतो हा आजार
उच्च रक्तदाब वाढल्यानंतर धमन्यांच्या भिंतींवर जास्त दाब निर्माण होतो. ज्यामुळे धमन्यांच्या आतील नाजूक अस्तराला इजा होते आणि त्या कमी लवचिक होतात. लवचिक झालेल्या रक्तवाहिन्यांमध्ये अनावश्यक चरबीचा थर जमा होऊन राहतो. हीच समस्या पुढे जाऊन कोरोनरी आर्टरी डिसीजसारख्या गंभीर हृदयरोगांना कारणीभूत ठरते. तसेच योग्य वेळी लक्ष न दिल्यास हार्ट अटॅक येऊन मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दैनंदिन जीवनातील कोणत्या चुकीच्या सवयी शरीरासाठी अतिशय घातक ठरतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
शरीरात उच्च रक्तदाब वाढल्यानंतर हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते. सतत वाढलेल्या तणावामुळे हृदयाच्या स्नायूंमध्ये जाडी येतेआणि स्नायू हळूहळू कमकुवत होऊन जातात. तसेच कालांतराने हृदय निकामी होऊन जाते. याशिवाय शरीरात वाढलेल्या उच्च रक्तदाबामुळे मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांवर परिणाम होतो आणि स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते. काहीवेळा स्ट्रोक आल्यानंतर मेंदूच्या रक्तवाहिन्या फुटण्याची शक्यता असते. किडनीचे कार्य बिघडणे, रक्तवाहिन्यांमध्ये सूज किंवा फुगीरपणा निर्माण होणे, स्मरणशक्ती कमी होणे यांसारख्या असंख्य समस्यांना सामोरे जावे लागते. हा आजार केवळ एकाच अवयवावर नाहीतर संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम करतो.
उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणे सुद्धा फार आवश्यक आहे. शरीरात वाढलेला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. याशिवाय दैनंदिन आहारात फळे, पालेभाज्या, सुका मेवा आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. यामुळे आरोग्य सुधारते. तसेच आहारात मिठाचे कमीत कमी प्रमाणात सेवन करावे. अतिप्रमाणात मीठ खाल्ल्यास शरीराला हानी पोहचू शकते. आहारात पोटॅशियमयुक्त पदार्थांचा समावेश करावा. केळी, पालक, कडधान्ये इत्यादी पदार्थ नियमित खाल्ल्यास शरीराला फायदे होतील.
नियमित व्यायाम करणे, योगासने, प्राणायाम केल्यास तुम्ही कायमच हेल्दी राहाल. दररोज तीस मिनिटं चालल्यामुळे शारीरिक हालचाली होतात आणि घामावाटे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. योगा, ध्यान, वाचन, लेखन किंवा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे इत्यादी छोट्या मोठ्या बदलांमुळे अनेक सकारात्मक परिणाम शरीरात बदल दिसू लागेल. उच्च रक्तदाब किंवा आरोग्यासंबंधित कोणतीही गंभीर समस्या उद्भवल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.
Ans: 120 / 80 1 2 0 / 8 0 ते 140 / 90 1 4 0 / 9 0 mmHg दरम्यान असल्यास तो हाय-नॉर्मल मानला जातो.
Ans: बैठी जीवनशैली, जास्त मीठ खाणे, धूम्रपान, मद्यपान, तणाव, लठ्ठपणा आणि अनुवांशिकता ही उच्च रक्तदाबाची मुख्य कारणे आहेत.
Ans: दररोज ३० मिनिटे चालणे किंवा योगासने करा, धूम्रपान आणि मद्यपान टाळा.






